शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीपुढे उद्योग टिकविण्याचे आव्हान; निम्याहून अधिक कामगारांनी गाठले गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 00:35 IST

मुंबईसह नवी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : लॉकडाउनमुळे नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रदेखील धोक्यात आले आहे. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये काम करणारे निम्म्याहून अधिक कामगार गावाकडे पळाले आहेत. त्यामुळे लॉकडाउननंतर उद्योग सुरू झाल्यास औद्योगिक क्षेत्राला पुन्हा उभारी मिळणे कठीण झाले आहे.

मुंबईसह नवी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यानंतरदेखील लॉकडाउन हटविला जाण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी, मागील दोन महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या चाकरमान्यांनीही गावाकडे धाव घेतली आहे. त्यामध्ये नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचाही समावेश आहे.

राज्याच्या विविध भागांतील तसेच परराज्यांतील हे कामगार आहेत. त्यांनी गाव गाठल्याचा धसका औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी घेतला आहे. वर्षानुवर्षे काम करणारे कामगार निघून गेल्याने, लॉकडाउननंतर पुन्हा उद्योग सुरू झाल्यास प्रशिक्षित कामगारांची कमतरता भासणार आहे. त्याचा परिणाम उत्पादन निर्मितीवर पुढील वर्षभर होऊ शकतो. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच कामगारांच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेऊन उद्योग सुरू ठेवण्याची मागणी उद्योजकांच्या संघटनेने शासनाकडे केली होती; परंतु शासनाकडून केवळ अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेले उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती.

लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेले उद्योग वगळता सर्व उद्योग बंद आहेत. त्या ठिकाणचे कामगार गावी निघून गेल्यामुळे उद्योजकांना पुन्हा उद्योग सुरू करताना अडचण भासणार आहे. याचा मोठा फटका संबंधित व्यवसायासह शासनालादेखील बसणार आहे.- मंगेश ब्रह्मे, व्यवस्थापक, ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज् असोसिएशन

उद्योग टिकविण्यासाठी कामगार टिकविणे गरजेचे होते. त्यानुसार कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेऊन उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी शासनाकडे मागितली होती. परंतु सतत पाठपुरावा करूनदेखील ठोस निर्णय झाला नाही. परिणामी, उद्योग बंद असल्याने बेरोजगार झालेले कामगार गावाकडे गेले असून भविष्यात त्याचा फटका संपूर्ण उद्योग क्षेत्राला बसणार आहे.- के. आर. गोपी, अध्यक्ष, लघू उद्योजक संघटना

नवी मुंबईच्या एमआयडीसी क्षेत्रात सुमारे ४५०० मोठे उद्योग तर २००० च्या जवळपास छोटे उद्योग आहेत. त्यापैकी सुमारे २००० मोठे तर ३०० छोटे उद्योग सद्य:स्थितीला सुरू आहेत. उर्वरित उद्योग बंद असल्याने त्यांच्याशी संलग्न महावितरण, इंधन, वाहतूकदार यांनाही तोटा सहन करावा लागत आहे.

आशिया खंडातील सर्वाधिक मोठे औद्योगिक क्षेत्र नवी मुंबईत आहे. दिघा येथून ते नेरुळपर्यंत हे क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे एमआयडीसी क्षेत्र व रहिवासी क्षेत्र अशा दोन भागांत नवी मुंबई विभागली आहे. या औद्योगिक क्षेत्रात छोटेमोठे असे सुमारे सहा हजार उद्योग आहेत. त्यानिमित्ताने सुमारे साडेतीन लाखांहून अधिक कामगार तिथे नोकरी करीत आहेत. मात्र मागील पाच वर्षांत काही मोठे उद्योग वेगवेगळ्या कारणांनी राज्याबाहेर हलविले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला घरघर लागलेली असतानाच कोरोनामुळे नवे संकट कोसळले आहे. या संकटातून तिथले सर्वच उद्योग पुन्हा उभे राहू शकतील का? याबाबतही शंका आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या