शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्याचे आव्हान; तपासाबाबत संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:18 AM

महत्त्वाच्या गुन्ह्यातील दोषींची सुटका

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून त्याची उकल केल्यानंतरही न्यायालयात ते सिद्ध करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यामध्ये तपासातील बाबींसह साक्षीदार पलटण्याच्या कारणांचा समावेश आहे. याचा परिणाम पोलिसांच्या दोषसिद्धी प्रमाणावर होत आहे.एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल करून आरोपींना न्यायालयाद्वारे कठोर शिक्षा मिळेपर्यंत पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते, त्याकरिता गुन्हा घडल्यापासून ते त्याची उकल करेपर्यंतचा तपास महत्त्वाचा असतो. त्यामध्ये घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक तपास यासह साक्षीदार यांचा समावेश असतो. यानंतरही पकडलेल्या आरोपींविरोधात न्यायालयात दोष सिद्ध होऊ न शकल्याने पोलिसांची नाचक्की होत आहे. गुन्हे प्रकटीकरणात नवी मुंबई पोलिसांनी राज्यात आपला ठसा उमटवला आहे; परंतु पकडलेले गुन्हेगार अथवा संशयित शिक्षेपर्यंत पोहोचत नसल्याने पोलिसांची नाचक्की होत आहे. त्यामुळे गुन्हा उघड झाल्यानंतर आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केल्यापासून ते दोष सिद्ध होईपर्यंत पोलिसांची कसोटी पणाला लागत आहे. याबाबत पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी गतवर्षाच्या सुरुवातीलाच चिंता व्यक्त करत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार २०१८ च्या तुलनेत अवघी तीन टक्क्यांनी वाढ होऊन गतवर्षात २५.३६ टक्के दोषसिद्ध होऊ शकले आहेत. त्यावरून नवी मुंबई पोलिसांपुढे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्याचे आव्हान दिसून येत आहे.

पोलिस तपासातील त्रुटी दूर करण्यासह भक्कम साक्षीदार व सबळ पुरावे गोळा करण्यात सुसूत्रता आणण्याची गरज व्यक्त होत आहे. गतवर्षात न्यायालयात लागलेल्या निकालांपैकी हत्येच्या २५ गुन्ह्यांचाही समावेश आहे. दोषारोपपत्र सादर केलेल्या २५ पैकी अवघ्या आठ गुन्ह्यांतील आरोपींवरील दोष सिद्ध होऊ शकले. तर हत्येच्या प्रयत्नाच्या १६ पैकी फक्त सहा गुन्ह्यांतील आरोपी शिक्षेपर्यंत पोहोचू शकले आहेत. पोक्सो अंतर्गतच्या गुन्ह्यांच्या बाबतीतही हेच पाहायला मिळत आहे. पोक्सोच्या ३७६ कलमांतर्गत दाखल ३६ गुन्ह्यांपैकी केवळ १४ गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा लागलेली आहे. तर ३५४ व ३६३ कलमांतर्गतच्या ३० पैकी १३ गुन्हे न्यायालयात सिद्ध होऊन उर्वरित गुन्ह्यात अटक असलेल्यांची सुटका झाली आहे. तर बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये खोटी तक्रार अथवा साक्षीदार पलटल्याने न्यायालयात गुन्हा सिद्ध न झाल्याचाही परिणाम पोलिसांच्या दोषसिद्धी प्रमाणावर झाला आहे. गतवर्षात बलात्काराच्या १७ गुन्ह्यांपैकी १६ गुन्ह्यांचा खटला न्यायालयात चालला. त्यामधील सात गुन्ह्यांतील फिर्यादींनी न्यायालयात पलटी मारली, तर सात गुन्ह्यांत दोघांच्या संमतीने शरीरसंबंध झाल्याचे न्यायालयात समोर आले. त्यामुळे गतवर्षात बलात्काराचा एकही गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊ शकलेला नाही.