शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

कॅडबरी-शास्त्रीनगरचा उड्डाणपूल गुंडाळला

By admin | Updated: November 12, 2014 22:47 IST

कॅडबरी ते शास्त्रीनगर मार्गावर 8क्क् मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा 13क् कोटींचा प्रस्ताव तिजोरीत पैसा नसल्याच्या कारणास्तव ठाणो महापालिकेने बासनात गुंडाळला आहे.

ठाणो : वर्तकनगर, शिवाईनगर आणि पोखरण रोड येथील वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर कॅडबरी ते शास्त्रीनगर मार्गावर 8क्क् मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा 13क् कोटींचा प्रस्ताव तिजोरीत पैसा नसल्याच्या कारणास्तव ठाणो महापालिकेने बासनात गुंडाळला आहे.  
विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी हा प्रस्ताव विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी शासनापुढे मंजूरीसाठी आणला होता. नितीन कंपनीकडून येणा:या उड्डाणपुलालाच तो जोडण्यात यावा, अशी मागणी केली होती. तसेच याच भागात 12क् फुटांचे रस्ते तयार करण्याचे प्रस्तावित केले होत़े त्यानुसार, पालिकेने ऑगस्ट महिन्यात अभ्यासही केला होता. परंतु, अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलाला छेद देऊन दुस:या उड्डाणपुलाची निर्मिती करणो शक्य नसल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले. तसेच पालिकेला या कामासाठी अधिकचा खर्च करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या पुलासाठी वेगळे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत पालिकेने व्यक्त केले होते. 
विशेष म्हणजे, हा प्रस्ताव कागदावर असतानाही त्याचे श्रेय घेण्यासाठी पालिकेत राजकीय कलगीतुरा रंगला होता. परंतु, पालिकेने अद्यापही हा प्रस्ताव निधी नसल्याचे कारण पुढे करून महासभेसमोर सादर केलेला नाही. (प्रतिनिधी)
 
घोडबंदर रस्त्यावर वाहतूककोंडी झाली तर पर्यायी रस्ता म्हणून वर्तकनगर, गांधीनगरच्या रस्त्यांकडे बघितले जाते. कॅडबरी नाक्यावरून वर्तकनगरमार्गे पोखरण रस्त्याने टिकुजिनीवाडी, तुळशीधाम येथून वाहनांना बाहेर पडता येते. वर्तकनगर येथून लोकमान्यनगरकडेही जाता येते. 
 
कॅडबरी नाका ते शास्त्रीनगर हा 12क् फूट रुंदीचा रस्ता शहर विकास आराखडय़ात प्रस्तावित आहे. मात्र, त्या रस्त्याचे पूर्णपणो रुंदीकरण होऊ शकले नाही. तो काही ठिकाणी 6क् ते 8क् फूट अस्तित्वात आहे. परंतु, आता महापालिका आयुक्तांनीच उड्डाणपुलाऐवजी या पर्यायी रस्त्याला पसंती दिल्याची माहिती पालिका सूत्रंनी दिली.
 
या ठिकाणी बाधित होणा:या कुटुंबांना कोलशेत येथे हलविण्यात येऊ शकते का, याची चाचपणीही सुरू झाली आहे. तसेच उड्डाणपुलापेक्षा या रस्त्याच्या कामाला खर्च कमी येणार असल्याने पालिका आता त्या अनुषंगाने विचार करीत असल्याचेही सूत्रंचे म्हणणो आहे. यामुळे हा उड्डाणपूल कागदावरून पुढे सरकण्याऐवजी पालिकेच्या दप्तरी जमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.