शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

महापौरांचा मुख्यालयावर बहिष्कार

By admin | Updated: October 6, 2016 03:58 IST

महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनामधील वाद विकोपाला गेले आहेत. सर्वसाधारण सभेच्या व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा आदर केला जात

नवी मुंबई : महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनामधील वाद विकोपाला गेले आहेत. सर्वसाधारण सभेच्या व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा आदर केला जात नसल्यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाची मनमानी थांबेपर्यंत पालिका मुख्यालयामध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरांचाही अवमान होत असल्यामुळे शहरवासीयांमध्येही असंतोषाची भावना वाढू लागली असून त्याचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामधील संवाद पूर्णपणे थांबला आहे. पालिकेमध्ये आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्यापासून लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये संवाद निर्माण व्हावा यासाठी महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रयत्न केले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आयुक्त नगरसेवकांना भेटत नाहीत, त्यांच्या सूचनांचा आदर करत नसल्याच्या तक्रारी अनेक वेळा करण्यात आल्या होत्या. पण आता तर प्रशासनातील इतर अधिकारीही लोकप्रतिनिधींचे मत एकूण घेत नाहीत. काहीही काम सुचविले तरी आयुक्त रागावतील असे सांगून टाळले जात आहे. यामुळे नाराज झालेल्या महापौरांनी सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसेल व प्रशासन मनमानीपणे कामकाज करणार असेल तर आम्ही पालिकेत जायचेच कशाला असा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत प्रशासन लोकप्रतिनिधींचा योग्य आदर करणार नाहीत, तोपर्यंत पालिकेत जाणारच नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. महापौरांच्या या भूमिकेमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयाविषयी माहिती देताना महापौर सुधाकर सोनावणे यांनी मे महिन्यापासूनचा घटनाक्रम उलगडून सांगितला आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर अद्याप एकदाही भेट घेतलेली नाही. ज्या दिवशी पदभार स्वीकारला त्या दिवशी महापौर स्वत:च आयुक्तांच्या घरी जावून त्यांना भेटले. यानंतरही आयुक्तांनी त्यांची कधीच भेट घेतलेली नाही. यामुळे पुन्हा एकवेळ त्यांच्या निवासस्थानी जावून शहरातील समस्यांवर चर्चा केली. कधीच संवाद होतच नसेल व आम्ही सर्वसाधारण सभेत घेतलेल्या निर्णयांचीही अंमलबजावणी होत नसल्याने फक्त खुर्चीवर बसण्यासाठी पालिकेत जावू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)