शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाजपचे मताधिक्य वाढले, शेकापची मात्र पिछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 00:52 IST

२०१४ च्या तुलनेत शेकापची सुमारे २५ हजार मते घटली

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी शेकाप आघाडीच्या हरेश केणी यांचा विक्रमी ९२ हजार ३७० मतांनी पराभव केला. गेल्या २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत पनवेलमध्ये भाजपचे मताधिक्य ५३ हजारांनी वाढले असून शेकापचे मताधिक्य गेल्या निवडणुकीपेक्षा २५ हजारांनी कमी झालेले दिसून येत आहे. शहरीकरणाचा फटका शेकापला बसल्याचे या निवडणुकीत दिसून येत आहे.

पनवेलमध्ये २०१९ च्या निवडणुकीत केवळ ५४ टक्के मतदान झाल्याने त्याचा फायदा व नुकसान कोणाचे होते, याची चर्चा रंगू लागली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष गुरुवारच्या निवडणूक निकालाकडे राहिले होते. सकाळी ८.१५च्या सुमारास व्ही. के. हायस्कूल येथे मतमोजणीला सुरुवात झाली. या वेळी शेकाप आघाडी व भाजप-सेना कार्यकर्त्यांची तुरळक गर्दी दिसून होती. ९.३०च्या सुमारास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली.

प्रत्येक फेरीचे निकाल लागत गेले व प्रशांत ठाकूर विजयाची आघाडी घेत गेले. या वेळी भाजपचे झेंडे कार्यकर्ते भिरकवत होते. तर भाजपला मिळत गेलेली आघाडी पाहून शेकापच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. जवळपास लाखाच्या फरकाने मिळालेला विजय पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलाल उधळून, फटाके फोडून त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रशांत ठाकूर विजयी झाल्यानंतर गावागावांत आनंद व्यक्त करण्यात आला.

२०१९ व्या निवडणुकीत भाजपचे प्रशांत ठाकूर यांना एक लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली. त्यामुळे भाजपचे मताधिक्य गेल्या निवडणुकीपेक्षा ५३ हजार ४३९ मतांनी वाढले. तर शेतकरी कामगार पक्षाचे हरेश केणी यांना या निवडणुकीत ८६ हजार २११ मते मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना एक लाख ११ हजार ९२७ मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत २५ हजार ७१६ मतांनी शेकापचे मताधिक्य कमी झाले आहे. या निवडणुकीत कमी झालेल्या मतदानामुळे शेकापवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.

रायगड जिल्ह्यात शेकापचा एकही आमदार निवडून आलेला नाही. पनवेल, उरण, पेण, अलिबाग या चार तालुक्यांतील शेकापच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. शेकापचे पेण येथील विद्यमान आमदार धैर्यशील पाटील व अलिबागचे विद्यमान आमदार पंडित पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झालेला आहे. तर उरण येथे माजी आमदार विवेक पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव झालेला आहे.पनवेल विधानसभा निवडणुकीत नोटाला तिसºया क्रमांकाची मते मिळाली. नोटाने १२ हजार ३७१ मते मिळवली. भाजप व शेकाप उमेदवारानंतरची ही सर्वाधिक मते आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019panvel-acपनवेलBJPभाजपा