शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बदलत्या जीवनशैलीच्या अध्यायाचा प्रारंभ; कोरोनामुळे सवयीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 4:27 AM

शंभर दिवसांमध्ये बरे, वाईट अनुभव; पारंपरिक गोष्टींकडे पुन्हा वाटचाल

अरुणकुमार मेहत्रे 

कळंबोली : गेल्या तीन महिन्यांपासून घरी बंदीस्त असलेली लहान मुले , वयस्कर व्यक्ती, कुटुंबातील सर्वच सदस्यावर या कोरोनाचा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे अनेक सवयी बदलल्या आहेत.

दररोज शाळा, त्याचबरोबर मैदानावर बागडणारी बच्चे कंपनी खेळणे विसरली आहेत. एका ठिकाणी न बसणाऱ्या लहान मुलांना सुरुवातीला घरात बंदीस्त राहणे अवघड गेले. परंतू आता त्यांना सवय झाली आहे. टिव्हीच्या सानिध्यात आवडता कार्यक्रम ,कार्टून पाहण्यात ते दिवस घालवत आहेत. जून महिन्यात शाळेकडून आॅनलाईन अभ्यासक्रम चालू झाल्याने मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण घेणे सुरु केले आहे.

दर आठवड्याला खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये गर्दी करणाºया नागरीकांचा तेथे होणारा खर्च नियंत्रणात आला आहे. बाहेर न पडल्याने कुटुंबातील सदस्यांच्या झोपेत वाढ झाली आहे. सकाळ- संध्याकाळ फिरायला जाणारी आणि व्यायाम करणारी लोकं घरीच गच्चीवर, गॅलरीत योगासने करत आहे. मिळलेल्या वेळेत पुस्तकात रमणे सोपे झाले. तीन महिन्यात खूपश्या सवयी बदलल्या आहे. लॉकडाऊनमुळे सगळ्यांनाच वेळ मिळाला. ऐवढे नव्हे तर आता वेळ कसा घालवावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला. तरी देखील सर्वांनीच आहे त्या परिस्थितीशी मिळते जुळते घेण्यास सुरुवात केली. दूर राहून काम करणे , दूर राहून वैद्यकीय मदत मिळवणे, विविध तंत्रज्ञानच्या साह्याने शिक्षण घेणे याची सवय झाली आहे. परिस्थितीवर मात करण्याच्या गरजेतून लोक नवनवीन शोध लावण्याबरोबर युक्त्याही लढवत आहेत. त्यामुळे  दिवसेंदिवस डिजिटल सेवेत भर पडत आहे. काही गोष्टींत बदल झालेला ट्रेंड आता नागरिकांना हवाहवासा वाटू लागला आहे. काही बाबींचा कंटाळा आला आहे. कोरोनामुळे मानवी दैनंदिन जीवन जगणे पूर्णपणे बदलून गेले आहे. लोकांच्या जीवनशैलीतच बदल झाला आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.कुटुंबात स्नेहभाव वाढलानवी मुंबई : लॉकडाऊनला तब्बल शंभर दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या शंभर दिवसांच्या काळात अनेक गोष्टी बदलल्या. उद्योगधंदे ठप्प झाले. लाखो बेरोजगार झाले. हातावर पोट असणाºया कष्टकऱ्यांचे हाल झाले. एकूणच लॉकडाऊनमुळे जगण्याचे परिमाणच बदलेले. कुटुंब व्यवस्थेत परिणामकारक बदल घडले. लॉकडाऊन ही संधी समजून अनेक कुटुंबातील सैल झालेल्या नात्यांच्या विणा घट्ट झाल्या, तर परस्परातील हरवलेला संवाद पुनर्स्थापित झाला.अनेकांना नैराश्य आले आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, हे परिणाम कुटुंबनिहाय वेगवेगळे आहेत. कुटुंबाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक अशा तीन प्रकारांत वर्गवारी करण्यात येते. तिन्ही प्रकारच्या कुटुंबांवर लॉकडाऊनचे विभिन्न परिणाम दिसून येतात. हातावर पोट असलेल्या कुटुंबांच्या व्यथा वेगळ्या आहेत. घरात राहून त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात कलह निर्माण करण्यास लॉकडाऊन कारण ठरत आहेत.आर्थिक परिस्थिती बºयापैकी असलेल्या आणि शैक्षणिक दर्जा उत्तम असलेल्या कुटुंबासाठी लॉकडाऊन संधी वाटते आहे. मोबाइल, गेमिंग, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर, फेसबुक आदींसह टीव्ही आदी मनोरंजनाची विपुल साधने उपलब्ध असल्याने अशा कुटुंबात मौजमस्तीचे वातावरण पाहावयास मिळते, परंतु मानवी मनाचा विचार करता, ही प्रक्रियासुद्धा मर्यादित स्वरूपाची. त्यामुळे कधी एकदाचे लॉकडाऊन संपते, अशी नैराश्यपूर्ण प्रतिक्रिया त्यांच्यातून उमटत आहे.मध्यमवर्गीय कुटुंबाचेही फारसे वेगळे नाही. आठ-पंधरा दिवस ठीक आहे. परंतु सलग तीन महिन्यांच्या कोंडीने कुटुंब संस्थेच्या मूल्यांनाच हादरे बसताना दिसत आहेत. असे असले तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन संपूर्ण अनलॉक कधी होईल, याची सध्या कोणीच ग्वाही देऊ शकत नाही. त्यामुळे पुढील आणखी काही महिने लॉकडाऊनमध्येच राहावे लागणार, हे सर्वसामान्यांना आता उमजले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस