शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

चळवळ संपवण्याचा होतोय प्रयत्न, आंबेडकरी संघटनांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:05 AM

आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्याकरिता आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आंबेडकरी विचारांच्या घटकपक्षांनी वाशीत केला.

नवी मुंबई : आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्याकरिता आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आंबेडकरी विचारांच्या घटकपक्षांनी वाशीत केला. महाराष्टÑ बंदच्या दरम्यान आंदोलनात सहभागी नसलेल्यांवरही गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड होत असल्याने पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. तर काही ठिकाणी आंदोलनाला लागलेले हिंसक वळण हे त्रयस्थ व्यक्तींनी केलेले सूडबुद्धीचे राजकारण असल्याचाही त्यांचा आरोप आहे.भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह नवी मुंबईतही ठिकठिकाणी भीमसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या दरम्यान, एपीएमसीमधील दोन गटांतील वाद व रबाळेतील हाणामारी वगळता इतर कुठे आंदोलनाला हिंसक वळण लागले नाही; परंतु आंदोलनाच्या दुसºया दिवसापासून पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असून, आंदोलनात सहभागी नसलेल्यांनाही अटक केली जात असल्याचा आरोप जिल्हाअध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी पत्रकार परिषदेत केला. आंबेडकरी विचारांच्या पक्षांच्या वतीने वाशी येथे ही परिषद घेण्यात आली. याप्रसंगी भारिपचे अरुण गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे ख्वाजामिया पटेल, संभाजी ब्रिगेडचे सचिन सावंत, विजय कांबळे, यशपाल ओहोळ आदी उपस्थित होते. पोलिसांनी अद्यापपर्यंत १२५ जणांना अटक केली असून, त्यापैकी ७५ जणांना न्यायालयातून, तर २० जणांना टेबल जामीन मिळालेला आहे; परंतु जे आंदोलनात सहभागी नव्हते, अशांनाही अटक करून आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा घाट असल्याचाही आरोप ओहोळ यांनी केला. यामुळे देशाचे भवितव्य धोक्यात असल्याची चिंता भारिपचे अरुण गायकवाड यांनी व्याक्त केली. तर महाराष्टÑ बंदच्या दरम्यान शांततेत आंदोलने होत असताना, त्रयस्थ संघटनांनी दंगे घडवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे सचिन सावंत यांनी केला.