शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

माथाडींसह मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 2:32 AM

मराठा आरक्षण कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरविल्यामुळे नवी मुंबईमधील माथाडी कामगारांसह सकल मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी मुंबई - मराठा आरक्षण कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरविल्यामुळे नवी मुंबईमधील माथाडी कामगारांसह सकल मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला असून आरक्षणाचे यश चळवळीतील हुतात्म्यांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया चळवळीतील शिलेदारांनी व्यक्त केली आहे.माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी चार दशकांपूर्वी मराठा आरक्षणासाठी लढा सुरू केला. राज्यभर आंदोलने सुरू केली. १९८२ मध्ये विधानसभेवर निर्णायक मोर्चा काढला. आरक्षण जाहीर केले नाही तर उद्याचा सूर्य पाहणार नाही असा इशारा सरकारला दिला. सरकारने निर्णय न घेतल्यामुळे त्यांनी समाजासाठी हौतात्म्य पत्करले. यानंतरही आरक्षणासाठी लढा सुरू झाला. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो नागरिकांनी मूक मोर्चा काढला. आरक्षण जाहीर होत नसल्यामुळे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनही केले. यानंतर सरकारने आरक्षण जाहीर केले. या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरविल्यामुळे माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अण्णासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांनी समाजासाठी हौतात्म्य पत्करले. त्यांच्यानंतरही आरक्षणासाठी अनेक शहीद झाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर हा विजय त्या सर्व शहिदांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबईमधील मान्यवरांनी व्यक्त केली.आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये नवी मुंबईकरांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोकणभवनवर काढलेल्या मोर्चामध्ये शहरातील लाखो नागरिक सहभागी झाले होते. मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चासाठी राज्यातून आलेल्या आंदोलकांच्या राहण्याची सोयही येथे करण्यात आली होती. यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागताच चळवळीत सहभागी झालेल्या सर्वांनी आनंद व्यक्त केला.उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत केलेल्या आंदोलनाचे सार्थक झाले. जे दोन ते तीन टक्के आरक्षण कमी होत आहे त्यासाठीही सनदशीर मार्गाने पाठपुरावा सुरू राहील. हे यश मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात शहीद झालेल्यांना समर्पित करत आहोत.- अंकुश कदम, मराठा क्रांतीमोर्चा, महाराष्ट्र समन्वयकमराठा आरक्षणाची चळवळ माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केली. त्यांच्या लढ्याला आज यश आले आहे. त्यांच्या विचाराचा व दूरदृष्टीचा विजय असून आजचा निर्णय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.- संतोष आहिरे, माथाडी प्रतिनिधीमराठा आरक्षण कायदा वैध ठरल्यामुळे समाजामधील कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संविधानाच्या तरतुदीनुसार मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आतापर्यंत मागास राहिलेला समाजातील घटक प्रवाहात येणे शक्य होईल. - गणेश ढोकळे-पाटील, समन्वयक मराठा क्रांती मोर्चासर्वांना आनंद झाला आहे. आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लाखो नागरिकांनी मूक मोर्चा काढला. लढ्यामध्ये प्रत्येकाने त्याच्या क्षमतेमुळे योगदान दिले. न्यायालयाने आरक्षण वैध ठरविल्यामुळे साहजिकच सर्वांना आनंद झाला असून आतापर्यंतच्या लढ्यात शहीद झालेल्यांना हा विजय समर्पित आहे.- प्रशांत सोळसकर,नेरूळआरक्षणासाठी प्रत्येक घरातील व्यक्ती आंदोलनात सहभागी झाली होती. या लढ्यामुळे सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा वैध ठरविल्यामुळे सर्वांना आनंद होत आहे. आता याची अंमलबजावणी लवकर करण्यात यावी.- मिलिंद सूर्याराव, समन्वयक मराठा,क्रांती मोर्चामराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या लढ्यामध्ये प्रत्येक नागरिकाने योगदान दिले होते. या लढ्याला यश आले असून आरक्षणामुळे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळेल. आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करावी ही विनंती.- जितेंद्र रौंदळे, बेलापूर

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण