शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

अटल सेतू थेट अलिबागला जोडणार; दक्षिण मुंबईतून प्रवास दीड तासात!

By नारायण जाधव | Updated: March 28, 2026 11:48 IST

सिडकोच्या कोस्टल रोडमुळे विमानतळ प्रवासही वेगाने

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न साकारल्यानंतर सिडकोने आता या परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार मुंबई-नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ‘अटल सेतू’ला थेट विमानतळ, जेएनपीए आणि पुढे अलिबागला जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. 

याचाच भाग म्हणून उलवे कोस्टल रोडचा विस्तार करून तो रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला असून, त्यासाठी  सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची नुकतीच प्रक्रिया सुरू केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई-अलिबाग हा प्रवास केवळ दीड तासांत होणार आहे. मार्गाच्या विस्तारामुळे अटल सेतूपासून द्रोणागिरीमार्गे करंजा-रेवस पुलापर्यंत अखंड कोस्टल कॉरिडॉर उभा राहणार असून, नवी मुंबई, नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोकण यांच्यातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल. परिणामी, वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या अटल सेतू ते नवी मुंबई  विमानतळ जोडणारा ७ कि.मी. लांबीचा सहा-लेन उलवे कोस्टल रोड उभारला जात आहे. 

या मार्गाचा पुढील टप्पा म्हणून द्रोणागिरीमार्गे करंजा खाडी पुलापर्यंत विस्तार करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यासाठी तांत्रिक अभ्यास, पर्यावरणीय परिणामांचा आढावा आणि खर्चाचा अंदाज तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची निविदाप्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

खारफुटीचे जंगल वाचविण्यासाठी एलिव्हेटेडचा विचार

प्रस्तावित विस्तार मोठ्या प्रमाणावर एलिव्हेटेड (उंचावरील) स्वरूपात उभारण्याची शक्यता आहे. खारफुटी क्षेत्राला बाधा होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी स्टिल्ट्सवर रस्ता उभारण्याचा पर्याय विचारात आहे. सहा-लेन किंवा त्याहून अधिक क्षमतेचा हा सिग्नल-फ्री मार्ग अटल सेतू, विमानतळ, द्रोणागिरी आणि पुढे रेवस-करंजा पूल अशी अखंड जोडणी निर्माण करील.

विस्तारानंतर खर्च किती?

सध्याच्या उलवे कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च १,६०० कोटी रुपये आहे. त्याच धर्तीवर विस्ताराचा अंदाजे खर्च २,५०० ते ४,००० कोटी रुपयांदरम्यान जाऊ शकतो. मात्र, अंतिम आकडे सविस्तर प्रकल्प अहवालानंतरच स्पष्ट होणार आहेत.

वाहतुकीला कसा दिलासा?

अटल सेतूपासून विमानतळ व द्रोणागिरीपर्यंत सिग्नल-फ्री प्रवासपाम बीच रोडसह मुख्य मार्गांवरील वाहतूक ताण कमीप्रवासाचा वेळ २०-३० मिनिटांनी घटणारजेएनपीए कंटेनर ट्रॅफिक शहराबाहेर वळवणे शक्य

रेवस जोडणीचे फायदे

कोस्टल रोडला रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडल्यास नवी मुंबई-अलिबाग-कोकण थेट रस्त्याने जोडले जाईल. फेरी बोटीवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यटनाला चालना मिळेल, तसेच जेएनपीए व द्रोणागिरी क्षेत्रासाठी लॉजिस्टिक्स अधिक सुलभ होईल.

किती वेळेची बचत होणार?

मुंबईतून सायन-पनवेलमार्गे गोवा महामार्गावरून प्रवास केल्यास ९० किमी अंतर पार करावे लागते. यासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागतो. परंतु  अटल सेतू उलवे कोस्टल रोड आणि रेवस-करंजा पुलाच्या निर्मितीनंतर हे अंतर ५५ ते ६० किमी होईल.   

English
हिंदी सारांश
Web Title : Atal Setu to Alibaug: 90-minute Mumbai travel dream nears reality.

Web Summary : Atal Setu will soon connect directly to Alibaug via the Ulwe Coastal Road extension. This reduces Mumbai-Alibaug travel to 90 minutes. The project includes a bridge over the Revdanda creek, enhancing connectivity between Mumbai, Navi Mumbai Airport, and Konkan, promising faster, smoother traffic flow.
टॅग्स :alibaugअलिबाग