शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Atal Bihari Vajpayee : विमानतळाचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:42 AM

- नामदेव मोरेनवी मुंबई - दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला संवर्धन व विकासासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चालना दिली होती. किल्ल्याला भेट देऊन निधीही मंजूर केला होता. देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई विमानतळासाठी प्राथमिक तयारी त्यांच्या कार्यकाळात झाली. त्यांच्या निधनामुळे रायगडसह विमानतळ विकासाचे स्वप्न पाहणारे द्रष्टे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना ...

- नामदेव मोरेनवी मुंबई - दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला संवर्धन व विकासासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चालना दिली होती. किल्ल्याला भेट देऊन निधीही मंजूर केला होता. देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई विमानतळासाठी प्राथमिक तयारी त्यांच्या कार्यकाळात झाली. त्यांच्या निधनामुळे रायगडसह विमानतळ विकासाचे स्वप्न पाहणारे द्रष्टे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.१८ फेब्रुवारी २०१८ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात आली. या वेळी पंतप्रधानांनी विमानतळाच्या प्रवासावर दृष्टिक्षेप टाकला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण वाढू लागल्यामुळे १९९८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न पाहण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. वाजपेयी यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारू लागले आहे. भविष्याचा वेध घेऊन त्यांनी नवी मुंबई विमानतळासाठीची प्राथमिक तयारी सुरू केली होती. २००४ मध्ये वाजपेयी सरकार सत्तेवर असतानाच विमानतळासाठी सीआरझेड अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली होती व व नवी मुंबईमधील ग्रीनफिल्ड एअरपोर्टसाठी महत्त्वाची परवानगीही मिळाली होती. यामुळे नवी मुंबईमध्ये वाजपेयी प्रत्यक्षात महत्त्वाच्या प्रकल्पाच्या भूमिपूजन किंवा उद्घाटनासाठी आले नसले तरी विमानतळासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाची चाचपणी त्यांच्याच कार्यकाळात झाली होती. वाजपेयी यांनी पाहिलेले विमानतळाचे स्वप्न राज्यात व देशात भाजपाची सत्ता असतानाच प्रत्यक्ष साकार होऊ लागले असून, वेगाने विमानतळ उभारणीची कामे सुरू झाली आहेत. ३ एप्रिल १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. या वेळी त्यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधीची घोषणाही केली होती. मराठा साम्राज्याचे प्रतीक असलेल्या या किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर भाजपाचीच सत्ता असताना रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०० कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील विमानतळ व दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या संवर्धनाचे स्वप्न पाहणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआडगेल्यामुळे मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे.देशाच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांनी आयुष्यभर देशहिताचा विचार केला व देशाला प्रगतिपथावर नेणारे अनेक निर्णय घेतले. चारित्र्यसंपन्न व कवी मनाचे नेतृत्व हरपले असून, देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.- मंदा म्हात्रे,आमदार, बेलापूर मतदार संघदेशाच्या प्रगतीमध्ये अतुलनीय योगदान देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्यासोबत आमच्या वडिलांनी प्रत्यक्षात काम केले आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशहिताचा विचार करणाऱ्या नेतृत्वाने अखेरचा श्वास घेतला असल्यामुळे देशाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.- सुरेश हावरे,अध्यक्ष, शिर्डी साई संस्थानराजकारणामध्ये अनेक तपे कार्यरत राहूनही मनाची संवेदनशीलता त्यांनी कधीच कमी होऊ दिली नाही. ‘जय जवान व जय किसान’ची व्याप्ती त्यांनी ‘जय विज्ञान’पर्यंत नेली. देशाला महासत्ता बनविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले असून, त्यांच्या जाण्याने देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.- प्रशांत ठाकूर,आमदार, पनवेलस्वातंत्र्यापासूनच्या सर्वात चांगल्या व देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणाºया पंतप्रधानांमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश आहे. त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या मृत्यूमुळे देश द्रष्ट्या नेतृत्वाला मुकला आहे.- जयवंत सुतार,महापौर, नवी मुंबई महापालिकाअटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान व एकूणच राजकीय वाटचालीमध्ये केलेले काम अतुलनीय आहे. त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांचे कार्य भविष्यातही प्रेरणा देत राहील.- मारुती भोईर,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपाअटलबिहारी वाजपेयी देशाचे महानेते होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी खर्ची केले. विरोधी पक्षात असतानाही तत्कालीन पंतप्रधानांनी युनायटेड नेशनमध्ये देशाची बाजू मांडण्यासाठी त्यांना पाठविले होते.- सतीश निकम,जिल्हा सरचिटणीस भाजपा

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीNavi Mumbaiनवी मुंबई