शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:46 IST

थकीत वेतन तत्काळ देण्याचे आश्वासन

नवी मुंबई : राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्याशिवाय वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यासही विलंब होत आहे. असे अनेक प्रश्न निकाली काढण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रायगड भवनवर मोर्चा काढला होता. या वेळी तीन महिन्यांचे थकीत वेतन तत्काळ देण्याचे आश्वासन बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ठाणे, रायगड व मुंबई अशा तीन जिल्ह्यांतील ८०० हून अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी सीबीडी बेलापूर रेल्वेस्थानक येथून रायगड भवनपर्यंत टाळ वाजवत भजन करत आंदोलन केले. त्यास कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

मागील तीन महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामध्ये एक लाख सेविका तर एक लाख मदतनिसांचा समावेश आहे. हे सर्व जण मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यापैकी अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या वेतनावर होत आहे. अशातच त्यांचे वेतन रखडत असल्याने संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे.

या वेळी शिष्टमंडळाने सेवा योजनेच्या आयुक्त इंदिरा मालो यांची भेट घेऊन कर्मचाºयांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. त्याची दखल घेत अल्प कालावधीतच कर्मचाºयांना थकीत वेतन देण्याचे आश्वासन आयुक्त मालो यांनी दिल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कमही लवकरात लवकर देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, राजेश सिंह, दिनकर म्हात्रे यांच्यासह प्रकल्पप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवा योजना आयुक्तांच्या ठोस आश्वासनानंतर या मोर्चाची सांगता करण्यात आली.

वेळेवर वेतन देण्याची मागणी

अशाच प्रकारातून २०१७ मध्ये परभणी येथील अंगणवाडी सेविकेने आत्महत्याही केलेली असल्याचे संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कर्मचाºयांना वेळेवर वेतन मिळणे गरजेचे आहे. त्याची जाणीव बालविकास सेवा योजना विभागाला करून देण्याच्या उद्देशाने शनिवारी रायगड भवनवर मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र