शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:46 IST

थकीत वेतन तत्काळ देण्याचे आश्वासन

नवी मुंबई : राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्याशिवाय वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यासही विलंब होत आहे. असे अनेक प्रश्न निकाली काढण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रायगड भवनवर मोर्चा काढला होता. या वेळी तीन महिन्यांचे थकीत वेतन तत्काळ देण्याचे आश्वासन बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ठाणे, रायगड व मुंबई अशा तीन जिल्ह्यांतील ८०० हून अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी सीबीडी बेलापूर रेल्वेस्थानक येथून रायगड भवनपर्यंत टाळ वाजवत भजन करत आंदोलन केले. त्यास कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

मागील तीन महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामध्ये एक लाख सेविका तर एक लाख मदतनिसांचा समावेश आहे. हे सर्व जण मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यापैकी अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या वेतनावर होत आहे. अशातच त्यांचे वेतन रखडत असल्याने संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे.

या वेळी शिष्टमंडळाने सेवा योजनेच्या आयुक्त इंदिरा मालो यांची भेट घेऊन कर्मचाºयांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. त्याची दखल घेत अल्प कालावधीतच कर्मचाºयांना थकीत वेतन देण्याचे आश्वासन आयुक्त मालो यांनी दिल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कमही लवकरात लवकर देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, राजेश सिंह, दिनकर म्हात्रे यांच्यासह प्रकल्पप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवा योजना आयुक्तांच्या ठोस आश्वासनानंतर या मोर्चाची सांगता करण्यात आली.

वेळेवर वेतन देण्याची मागणी

अशाच प्रकारातून २०१७ मध्ये परभणी येथील अंगणवाडी सेविकेने आत्महत्याही केलेली असल्याचे संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कर्मचाºयांना वेळेवर वेतन मिळणे गरजेचे आहे. त्याची जाणीव बालविकास सेवा योजना विभागाला करून देण्याच्या उद्देशाने शनिवारी रायगड भवनवर मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र