शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विश्लेषण : पुनर्वसनाचा हव्यास घेतोय निष्पापांचा बळी

By नारायण जाधव | Updated: August 24, 2023 16:53 IST

आता तुलसी भवन इमारतीत तीन माळ्यांचे स्लॅब अशाच रीतीने कोसळले. यामुळे पुनर्वसनामागील अर्थकारणाची चर्चा पुन्हा एकदा ऐकायला येऊ लागली आहे. कालच्या घटनेत दोघांचे बळी गेले आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात सध्या जुन्या वसाहतींच्या पुनर्वसनाच्या अर्थकारणाने वेग घेतला आहे. शहरातील काही मातब्बर राज्यकर्ते, नगरसेवक आणि बिल्डरांच्या लॉबीने महापालिका आणि सिडकोसह पोलिसांतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून चांगल्या स्थितीतील इमारती धोकादायक ठरवून अथवा इमारतींत करण्यात येणाऱ्या नको त्या विकासकामांमुळे अपघात घडवून आपले पुनर्विकासाचे ईप्सित साध्य करण्याचा सपाटा चालविला असल्याची कुजबुज आता दबक्या आवाजात ऐकायला मिळू लागली आहे.

नेरूळ येथे गेल्या वर्षी जिमी पार्क इमारतीच्या सहाव्या माळ्यावर लादी बसविण्याचे काम सुरू असताना वरच्या मजल्याचा स्लॅब कोसळून तो थेट तळमजल्यापर्यंत आला. एकामागून एक अशा सहा माळ्यांपर्यंतचे स्लॅब कोसळले. यात एका निष्पाप विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेला. आता तुलसी भवन इमारतीत तीन माळ्यांचे स्लॅब अशाच रीतीने कोसळले. यामुळे पुनर्वसनामागील अर्थकारणाची चर्चा पुन्हा एकदा ऐकायला येऊ लागली आहे. कालच्या घटनेत दोघांचे बळी गेले आहेत.

यापूर्वी वाशी विभागात चांगल्या स्थितीतील इमारती संबंधित सोसायटीचे कथित संचालक मंडळ आणि काही राज्यकर्त्यांना हाताशी धरून बिल्डर लाॅबीने आपला स्वार्थ साधला आहे. यातून मग जादा चटईक्षेत्र मिळवून कोट्यवधींचा मलिदा लाटण्याचे सत्र सुरू झाले. यात साधे प्लास्टर कोसळले तरी स्लॅब कोसळल्याची आवई उठविण्यात आली. यात काही महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून तसे पंचनामे करण्यात आले. हीच मोडस ऑपरेंडी मग शहरातील जुईनगर, नेरूळ, कोपरखैरणे, ऐरोली, बेलापूर या नोडमध्ये अंगीकारली गेली.

मुळात हे प्लास्टरवजा स्लॅब का व कशामुळे कोसळले, त्या इमारतींच्या तत्कालीन संरचना अभियंता आणि वास्तुविशारदासह कंत्राटदारावर काय कारवाई केली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. कारण ती झालेलीच नाही. एखाद्या सोसायटीच्या संचालक मंडळाने इमारतीत नूतनीकरणाचे काम देताना सदनिकाधारकांकडून काय व कोणती कागदपत्रे घेतली, तो कोणते काम कसे करणार आहे, हे तपासणे आवश्यक आहे. मात्र तसे कोठेच होताना दिसत नाही. नेरूळ येथे गेल्या वर्षी जिमी पार्कच्या अपघाताचा तपास या अंगाने केला असता तर अनेक घटनांचा उलगडा झाला असता. आताही तुलसी दर्शनचा याच अंगाने तपास करायला हवा. कारण नुसत्या लाद्या बसविल्याने असे गंभीर अपघात हाेत नाहीत, असे या बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत ज्या ज्या विभागात ज्या इमारतींचे स्लॅब, सोसायटींचे स्लॅब कोसळले आहेत, त्यांच्या कथित संचालक मंडळातील अग्रणी लोकांचे मोबाइल कॉल डिटेल तपासले तर ते कोणत्या राजकारण्याच्या व बिल्डरच्या संपर्कात आहेत, कोणता महापालिका आणि पोलिस अधिकारी त्यांना मदत करीत आहे, याचा उलगडा होऊ शकतो. यातून नवी मुंबईतील पुनर्वसनाचे अर्थकारण किती खालच्या स्तराला गेले आहे, हे चव्हाट्यावर येऊ शकते. आता नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि पोलिस आयु्क्त मिलिंद भारंबे यांनी आपल्या तपास अधिकाऱ्यांना या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश दिले तर पुनर्वसनाचा हव्यास निष्पापांचा बळी कसा घेत आहे, हे उघड होऊ शकेल.

नवी मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्याआधी शहरातील धोकादायक, अतिधोकादायक आणि दुरुस्ती योग्य इमारतींची यादी जाहीर करते. ही यादी पाहिली तर गेल्या काही वर्षांपासून काही इमारती पुन्हा पुन्हा त्यात येत आहेत. मात्र, यातील काही तुरळक अपवाद वगळता या यादीतील एखाद दुसऱ्या इमारतीत अपघात घडला आहे. उर्वरित इमारती ठणठणीत आहेत. मात्र, दुसरीकडे महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर न केलेल्या इमारतीतही दुर्घटना घडल्या आहेत. त्या दुर्घटना का व कशामुळे घडल्या, तेथे पुनर्विकासाचे राजकारण, अर्थकारण रंगले होते का हे तपासणे आता गरजेचे वाटू लागले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई