शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

विश्लेषण : पुनर्वसनाचा हव्यास घेतोय निष्पापांचा बळी

By नारायण जाधव | Updated: August 24, 2023 16:53 IST

आता तुलसी भवन इमारतीत तीन माळ्यांचे स्लॅब अशाच रीतीने कोसळले. यामुळे पुनर्वसनामागील अर्थकारणाची चर्चा पुन्हा एकदा ऐकायला येऊ लागली आहे. कालच्या घटनेत दोघांचे बळी गेले आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात सध्या जुन्या वसाहतींच्या पुनर्वसनाच्या अर्थकारणाने वेग घेतला आहे. शहरातील काही मातब्बर राज्यकर्ते, नगरसेवक आणि बिल्डरांच्या लॉबीने महापालिका आणि सिडकोसह पोलिसांतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून चांगल्या स्थितीतील इमारती धोकादायक ठरवून अथवा इमारतींत करण्यात येणाऱ्या नको त्या विकासकामांमुळे अपघात घडवून आपले पुनर्विकासाचे ईप्सित साध्य करण्याचा सपाटा चालविला असल्याची कुजबुज आता दबक्या आवाजात ऐकायला मिळू लागली आहे.

नेरूळ येथे गेल्या वर्षी जिमी पार्क इमारतीच्या सहाव्या माळ्यावर लादी बसविण्याचे काम सुरू असताना वरच्या मजल्याचा स्लॅब कोसळून तो थेट तळमजल्यापर्यंत आला. एकामागून एक अशा सहा माळ्यांपर्यंतचे स्लॅब कोसळले. यात एका निष्पाप विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेला. आता तुलसी भवन इमारतीत तीन माळ्यांचे स्लॅब अशाच रीतीने कोसळले. यामुळे पुनर्वसनामागील अर्थकारणाची चर्चा पुन्हा एकदा ऐकायला येऊ लागली आहे. कालच्या घटनेत दोघांचे बळी गेले आहेत.

यापूर्वी वाशी विभागात चांगल्या स्थितीतील इमारती संबंधित सोसायटीचे कथित संचालक मंडळ आणि काही राज्यकर्त्यांना हाताशी धरून बिल्डर लाॅबीने आपला स्वार्थ साधला आहे. यातून मग जादा चटईक्षेत्र मिळवून कोट्यवधींचा मलिदा लाटण्याचे सत्र सुरू झाले. यात साधे प्लास्टर कोसळले तरी स्लॅब कोसळल्याची आवई उठविण्यात आली. यात काही महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून तसे पंचनामे करण्यात आले. हीच मोडस ऑपरेंडी मग शहरातील जुईनगर, नेरूळ, कोपरखैरणे, ऐरोली, बेलापूर या नोडमध्ये अंगीकारली गेली.

मुळात हे प्लास्टरवजा स्लॅब का व कशामुळे कोसळले, त्या इमारतींच्या तत्कालीन संरचना अभियंता आणि वास्तुविशारदासह कंत्राटदारावर काय कारवाई केली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. कारण ती झालेलीच नाही. एखाद्या सोसायटीच्या संचालक मंडळाने इमारतीत नूतनीकरणाचे काम देताना सदनिकाधारकांकडून काय व कोणती कागदपत्रे घेतली, तो कोणते काम कसे करणार आहे, हे तपासणे आवश्यक आहे. मात्र तसे कोठेच होताना दिसत नाही. नेरूळ येथे गेल्या वर्षी जिमी पार्कच्या अपघाताचा तपास या अंगाने केला असता तर अनेक घटनांचा उलगडा झाला असता. आताही तुलसी दर्शनचा याच अंगाने तपास करायला हवा. कारण नुसत्या लाद्या बसविल्याने असे गंभीर अपघात हाेत नाहीत, असे या बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत ज्या ज्या विभागात ज्या इमारतींचे स्लॅब, सोसायटींचे स्लॅब कोसळले आहेत, त्यांच्या कथित संचालक मंडळातील अग्रणी लोकांचे मोबाइल कॉल डिटेल तपासले तर ते कोणत्या राजकारण्याच्या व बिल्डरच्या संपर्कात आहेत, कोणता महापालिका आणि पोलिस अधिकारी त्यांना मदत करीत आहे, याचा उलगडा होऊ शकतो. यातून नवी मुंबईतील पुनर्वसनाचे अर्थकारण किती खालच्या स्तराला गेले आहे, हे चव्हाट्यावर येऊ शकते. आता नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि पोलिस आयु्क्त मिलिंद भारंबे यांनी आपल्या तपास अधिकाऱ्यांना या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश दिले तर पुनर्वसनाचा हव्यास निष्पापांचा बळी कसा घेत आहे, हे उघड होऊ शकेल.

नवी मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्याआधी शहरातील धोकादायक, अतिधोकादायक आणि दुरुस्ती योग्य इमारतींची यादी जाहीर करते. ही यादी पाहिली तर गेल्या काही वर्षांपासून काही इमारती पुन्हा पुन्हा त्यात येत आहेत. मात्र, यातील काही तुरळक अपवाद वगळता या यादीतील एखाद दुसऱ्या इमारतीत अपघात घडला आहे. उर्वरित इमारती ठणठणीत आहेत. मात्र, दुसरीकडे महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर न केलेल्या इमारतीतही दुर्घटना घडल्या आहेत. त्या दुर्घटना का व कशामुळे घडल्या, तेथे पुनर्विकासाचे राजकारण, अर्थकारण रंगले होते का हे तपासणे आता गरजेचे वाटू लागले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई