शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

टीकेनंतर माथाडी नेते एकाच व्यासपीठावर, संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 4:14 AM

माथाडी नेत्यांनी एकमेकांविरोधात केलेल्या टीकेनंतर कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. संघटनेमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नवी मुंबई : माथाडी नेत्यांनी एकमेकांविरोधात केलेल्या टीकेनंतर कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. संघटनेमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परस्परांवरील टीकेनंतर मंगळवारी सर्व नेते एकाच व्यासपीठावर येऊन कामगारांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला व संघटना राजकारणापासून दूर ठेवण्याचे आश्वासन दिले.कळंबोलीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेमध्ये माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. शासन माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर संघटनेचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे व जगताप यांच्यावर टीका केली होती. संघटनेमध्ये राजकारण सुरू झाल्याची टीका करून आता गद्दार ओळखण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर संघटनेमध्ये राजकीय फूट पडल्याचे स्पष्ट झाले होते. कामगारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. २३ मार्चला माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते. नेत्यांनी राजकारण व समाजकारण वेगळे ठेवावे, असे आवाहन कामगारांनी केले.माथाडी नेते नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांनीही कामगारांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. यापुढे अण्णासाहेबांची संघटना राजकारणापासून दूर ठेवून जे कोणी सत्तेवर येतील त्यांच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. नेते एकाच व्यासपीठावर आल्यामुळे कामगारांमधील संभ्रम काही प्रमाणात दूर झाला असला तरी ही एकजूट कायमस्वरूपी टिकणार का? असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे. २३ मार्चला होणाऱ्या मेळाव्यात कोण काय भूमिका घेणार याविषयीही उत्सुकता लागून राहिली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण