शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तान पे चर्चा... कपिल सिब्बल यांच्याकडून मोदींचं जाहीर कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 15:27 IST

अफगाणिस्तानमधील स्थिती भीषण होत चालली असून अनेक देश आपल्या नागरिकांना विशेष विमानांद्वारे मायदेशात नेत आहे. भारतानेही आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशात सुरक्षित आणलं आहे.

ठळक मुद्देअफगाणिस्तानमधील पीडित नागरिक कुठल्याही जातीधर्माचा असला तरी त्यांची भारताने मदत केली पाहिजे. देशाचं संविधान या नागरिकांच्या सुरक्षेची परवानगी आपल्याला देते, असेही सिब्बल यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा केल्यानंतर तिथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी भारताची बचाव मोहीम सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या विमानांद्वारे अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशात आणलं जात आहे. या बचाव मोहीमेला ऑपरेशन देवी शक्ती असं नाव नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या मोहिमेचं कौतुक करत भारतीय नागरिकांना धीर दिला आहे. आता, या मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं माजी मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी कौतुक केलंय.  

अफगाणिस्तानमधील स्थिती भीषण होत चालली असून अनेक देश आपल्या नागरिकांना विशेष विमानांद्वारे मायदेशात नेत आहे. भारतानेही आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशात सुरक्षित आणलं आहे. भारत सरकारच्या या यशस्वी मोहिमेबद्दल कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. तसेच, अफगाणिस्तानमधील पीडित नागरिक कुठल्याही जातीधर्माचा असला तरी त्यांची भारताने मदत केली पाहिजे. देशाचं संविधान या नागरिकांच्या सुरक्षेची परवानगी आपल्याला देते, असेही सिब्बल यांनी म्हटलं. 

दरम्यान, अफगाणिस्तानमधील बिकट स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत अफगाणिस्तानधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान मोदींनी यावेळी भारतीय नागरिकांना सुरक्षित आणण्यासह भारतात येण्याच इच्छुक असलेल्या तेथील अफगाण शीख आणि हिंदुंनाही सुरक्षित आणण्याचे निर्देश दिले आहेत.

भारत-पाकिस्तान वादात अफगाणिस्तान नको

तालिबानचा नेता शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सीएनएन-न्यूज 18 ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत स्टनिकझाई म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकाळ चालणाऱ्या भौगोलिक आणि राजकीय वादाची आम्हाला जाणीव आहे. पण, भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत वादात अफगाणिस्तानचा वापर करू नये, असं स्पष्ट मत स्टनिकझाईने व्यक्त केलंय. तसेच, तालिबानला शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत, असेही त्याने म्हटले.  

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलNarendra Modiनरेंद्र मोदीAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतairforceहवाईदल