शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

अफगाणिस्तान पे चर्चा... कपिल सिब्बल यांच्याकडून मोदींचं जाहीर कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 15:27 IST

अफगाणिस्तानमधील स्थिती भीषण होत चालली असून अनेक देश आपल्या नागरिकांना विशेष विमानांद्वारे मायदेशात नेत आहे. भारतानेही आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशात सुरक्षित आणलं आहे.

ठळक मुद्देअफगाणिस्तानमधील पीडित नागरिक कुठल्याही जातीधर्माचा असला तरी त्यांची भारताने मदत केली पाहिजे. देशाचं संविधान या नागरिकांच्या सुरक्षेची परवानगी आपल्याला देते, असेही सिब्बल यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा केल्यानंतर तिथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी भारताची बचाव मोहीम सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या विमानांद्वारे अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशात आणलं जात आहे. या बचाव मोहीमेला ऑपरेशन देवी शक्ती असं नाव नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या मोहिमेचं कौतुक करत भारतीय नागरिकांना धीर दिला आहे. आता, या मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं माजी मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी कौतुक केलंय.  

अफगाणिस्तानमधील स्थिती भीषण होत चालली असून अनेक देश आपल्या नागरिकांना विशेष विमानांद्वारे मायदेशात नेत आहे. भारतानेही आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशात सुरक्षित आणलं आहे. भारत सरकारच्या या यशस्वी मोहिमेबद्दल कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. तसेच, अफगाणिस्तानमधील पीडित नागरिक कुठल्याही जातीधर्माचा असला तरी त्यांची भारताने मदत केली पाहिजे. देशाचं संविधान या नागरिकांच्या सुरक्षेची परवानगी आपल्याला देते, असेही सिब्बल यांनी म्हटलं. 

दरम्यान, अफगाणिस्तानमधील बिकट स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत अफगाणिस्तानधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान मोदींनी यावेळी भारतीय नागरिकांना सुरक्षित आणण्यासह भारतात येण्याच इच्छुक असलेल्या तेथील अफगाण शीख आणि हिंदुंनाही सुरक्षित आणण्याचे निर्देश दिले आहेत.

भारत-पाकिस्तान वादात अफगाणिस्तान नको

तालिबानचा नेता शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सीएनएन-न्यूज 18 ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत स्टनिकझाई म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकाळ चालणाऱ्या भौगोलिक आणि राजकीय वादाची आम्हाला जाणीव आहे. पण, भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत वादात अफगाणिस्तानचा वापर करू नये, असं स्पष्ट मत स्टनिकझाईने व्यक्त केलंय. तसेच, तालिबानला शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत, असेही त्याने म्हटले.  

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलNarendra Modiनरेंद्र मोदीAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतairforceहवाईदल