शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

एसटी महामंडळाच्या ३४२ बसवर कारवाई, नाशिकमधील अपघातानंतर मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:12 IST

नाशिकमध्ये धोबीघाट परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एसटी महामंडळाची बस व रिक्षाच्या अपघातात सुमारे २५ जणांना जीव गमवावा लागला.

- वैभव गायकरपनवेल : एसटी महामंडळाच्या बसचालकांवर वारंवार बेशिस्तपणाने वाहन चालविण्याचे आरोप होत असतात. मात्र, सरकारी कर्मचारी असल्याने अनेकदा या वाहनचालकांना कारवाईतून झुकते माप दिले जाते. मात्र, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर २३ ते ३० जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या ३४२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.नाशिकमध्ये धोबीघाट परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एसटी महामंडळाची बस व रिक्षाच्या अपघातात सुमारे २५ जणांना जीव गमवावा लागला. तर ३५ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एसटीच्या अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर द्रुतगती महामार्ग पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. महामार्ग अधीक्षक विजय पाटील, पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्रचे डॉ. दिगंबर प्रधान, एसटी महामंडळाचे वाहतूक अधिकारी धनाजी घाटगे, अरुण विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली पळस्पे केंद्राच्या मार्फत दोन्ही मार्गिकेवर ही कारवाई करण्यात आली. सरकारी यंत्रणेवरील वाहन असल्याने एसटी महामंडळाचे चालक सर्रास वाहतूक नियमांना बगल देत वाहतुकीचे नियम यायदळी तुडवत असतात, त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो.कारवाईमध्ये एसटी महामंडळाच्या शिवनेरी, शिवशाही, विठाई, हिरकणी आदीसह इतर राज्य महामंडळाच्या बसचा समावेश आहे.वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या कारणावरून एसटी महामंडळाच्या वाहनचालकांवर ई-चलन मशिनद्वारे कारवाई करण्यात आली. कारवाईच्या वेळी पोलीस निरीक्षक सुदाम पातोरडकर, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, महाराष्ट्र राज्य दिनेश कदम, विनायक यादव, डी. पी. आंडील, मुंबई विभागाचे सहायक वाहतूक निरीक्षक पी. जी. माने उपस्थित होते.एसटी महामंडळाकडून गंभीर दखलकारवाई संदर्भात एसटी महामंडळस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपव्यवस्थापक संजय सुपेकर यांनी दिली.दंडाची रक्कम चालकांच्या वेतनातून वसुली?एसटी महामंडळाच्या ३४२ वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असल्याने, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हा दंड संबंधित चालकांच्या वेतनातून वसूल केला जाण्याची शक्यता आहे.एसटी बसद्वारे मोठ्या प्रमाणात प्रवासीवाहतूक होत असते. अतिवेगाने वाहन चालविणे, नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होतो. याबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येते. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याने विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली.- सुभाष पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक, पळस्पे केंद्र द्रुतगती महामार्ग

टॅग्स :state transportएसटी