शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

मुंबईच्या रेल्वे मार्गातील बाधित कांदळवनाची वृक्षारोपण भरपाई 900 किमी दूर, थेट गडचिरोलीत!

By नारायण जाधव | Updated: November 30, 2023 10:41 IST

एमआरव्हीसीला दिलेल्या पर्यावरणीय मंजुरीस पर्यावरणवाद्यांचा आक्षेप

नवी मुंबई: मुंबईरेल्वे विकास मंडळाच्या बोरिवली-विरार दरम्यान रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. मात्र या प्रकल्पामुळे होणारे कांदळवनाचे नुकसान लक्षात घेऊन केंद्राने भरपाई वृक्षारोपण 900 किलोमीटर दूर गडचिरोली येथे करण्याचे निर्देश दिले आहेत. 

या मंजुरीवर आक्षेप घेऊन नवी मुंबईतील पर्यावरणवादी बी. एन. कुमार यांनी म्हणाले की, अशा प्रकारची भरपाई वृक्षारोपण हास्यास्पद आहे. बोरिवली ते विरार स्थानकांदरम्यान मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एम.आर.व्ही.सी च्या) प्रकल्पासाठी 12.8 हेक्टर क्षेत्रावर असलेल्या कांदळवनाचे 'डायव्हर्जन करण्याची' मंजुरी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसीने) दिली आहे आणि त्यासोबत वनीकरण करण्यासाठी अट घातली आहे. 

नोंदींमध्ये असे पाहायला मिळालेले आहे की, बोरिवली ते विरार या पाचव्या आणि सहाव्या लाइन्ससाठी केंद्राने 17 नोव्हेंबर रोजी तत्त्वत: मान्यता दिली होती. कुमार, जे नाटकनेक्ट फाऊंडेशनचे प्रमुख सुद्धा आहेत, असे मत मांडले आहे की, 12,000 हून अधिक कांदळवनातील झाडांचे डायव्हर्जन करण्याचा अर्थ कांदळवन नष्ट करणे असाच निघतो आणि सरकारने 900 किमी दूरवर वृक्षारोपण करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. अशा प्रकारच्या भरपाईमुळे गडचिरोलीच्या जंगलात मासे आणि खेकड्यांची पैदास होऊ शकते का आणि मुंबई किनारपट्टीवरील जैवविविधतेच्या नुकसानीची भरपाई गडचिरोलीत कशी काय होऊ शकते, असे प्रश्न कुमार यांनी केले आहेत. 

सिडकोच्या कोस्टल रोडची वृक्षारोपण भरपाई जळगावात

कुमार पुढे म्हणाले की अशा प्रकारचा "अविचारी" आदेश जारी करण्यात येण्याची ही पाहिली वेळ नाही. याआधी ऑक्टोबरमध्ये, सिडकोकडून बांधण्यात येत असलेल्या नवी मुंबई सागरी रस्त्यामुळे (कोस्टल रोडमुळे) होणाऱ्या कांदळवनाच्या नुकसान भरपाईसाठी जळगावच्या एका गावात एमओईएफसीसीने परवानगी दिली होती. 

मच्छीमारांचे मोठे नुकसान

श्री एकविरा आरी प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार म्हणाले, कांदळवनाचा विनाश थेट पर्यावरणावर आणि मच्छीमार समाजाच्या उपजीविकेवर परिणाम करतो. त्यामुळे मच्छीमार समाजाला सुद्धा नुकसानभरपाई द्यायला हवी. शेकडो मैल दूर करण्यात येणारे नुकसान भरपाई वृक्षारोपण निरुपयोगी ठरेल, असेही ती म्हणाले. 

सागरी व गडचिरोलीतील वृक्षसंपदा वेगवेगळी

“गडचिरोलीतील अधोगती झालेल्या (डिग्रेडेड) वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आमची काहीच हरकत नाही, खरे पाहिले तर हे करणे गरजेचे आहे”, असे पवार म्हणाले आणि कांदळवन नष्ट करण्याच्या बदल्यात हे करण्याची गरज नसल्यावर त्यांनी भर दिला.कांदळवन आणि जमिनीवरील झाडे निसर्गाच्या जैवविविधतेत निराळ्या भूमिका बजावतात आणि त्यांच्याकडून त्यांच्या नैसर्गिक गुणांची अदलाबदल होणे असंभव आहे, असे पवार यांनी निदर्शनास आणून दिले. 

एमआरव्हीसीलावदिलेली वृक्षारोपणाची ही मंजुरी सामान्य ज्ञानावर गदा आणते, असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Mumbaiमुंबईrailwayरेल्वेGadchiroliगडचिरोलीforestजंगल