शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
4
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
5
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
6
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
7
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
8
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
9
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
10
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
11
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
12
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
13
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
14
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
15
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
16
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
17
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
18
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
19
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
20
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग परिसरातील २९ पूल धोकादायक

By admin | Updated: October 7, 2016 05:45 IST

अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २९ पुलांची परिस्थिती धोकादायक झाली आहे. हे सर्व पूल १५ टन क्षमतेच्या वाहनांकरिता बांधण्यात आले आहेत

जयंत धुळप , अलिबागअलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २९ पुलांची परिस्थिती धोकादायक झाली आहे. हे सर्व पूल १५ टन क्षमतेच्या वाहनांकरिता बांधण्यात आले आहेत; मात्र प्रत्यक्षात त्यावरून ३५ टन क्षमतेची अवजड वाहने सातत्याने ये-जा करीत असल्याने ही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, मुंबई-पुण्याच्या पर्यटकांनी रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे पाठच फिरवली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीतील पर्यटन व्यवसाय डबघाईस आला आहे. अलिबाग तालुक्यातील पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे वडखळ ते मुरुड व मांडवा, रेवस ते अलिबाग, कार्लेखिंड ते कनकेश्वर या रस्त्याची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेच्या शिष्टमंडळाने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची विनंती करण्याकरिता कार्यकारी अभियंता व्ही.बी. पाटील यांची भेट घेतली. त्या वेळी पाटील यांनी ही माहिती दिली. अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेच्या शिष्टमंडळात सचिव मनोज घरत, नागाव पर्यटक व्यावसायिक संघटनेचे प्रसाद शशिकांत आठवले आदींचा समावेश होता. या २९ पुलांपैकी एखादा पूल पडला तर जबाबदारी कोणाची, असा प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केला. त्या वेळी पाटील म्हणाले, २९ धोकादायक पुलांच्या बाबतीत परिवहन विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांसह सर्व शासकीय विभागांना आम्ही रीतसर कळविले आहे. धोकादायक पुलांच्या दोन्ही बाजूंना ते पूल धोकादायक असल्याबाबतचे फलक लावण्याची कार्यवाहीदेखील अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. मात्र उर्वरित पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्यात आले नसून पूल पडला तर परिस्थितीनुसार जबाबदारी निश्चित होईल. आत्ताच ती कुणाची हे सांगता येणार नाही, अशी भूमिका पाटील यांनी स्पष्ट केली.येत्या १५ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याविरुद्ध दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल. या सर्वांविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सरकारी निधीचा दुरुपयोग, अपहार, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा, व ‘संघटित गुन्हेगारी’ अधिनियम याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा तोंडी व लेखी इशारा शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता पाटील यांना दिला आहे.रस्ते दुरुस्तीकरितासोमवारी ई-टेंडररस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या कामाकरिता येत्या सोमवारी ई-टेंडर्स काढण्यात येणार आहेत. त्यानंतर १५ दिवसांनी रस्त्यांची दुरुस्ती होईल. नवीन रस्ता करण्याकरिता निधीच उपलब्ध नसल्याने खड्डे भरूनच रस्ते दुरुस्त करावे लागणार आहेत. अर्थात पाऊस थांबला तरच ही दुरुस्ती होईल. कारवाईच नाहीअलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेस कंत्राटदार कारणीभूत असल्याची तक्रार सातत्याने केली जात असताना, गेल्या काही वर्षांत एकाही कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली नसल्याचे पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. रस्ते दुरुस्त केल्यावर त्याची गुणवत्ता पडताळणी विभागाकडून एकदाही करण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.