शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

पाणीबिलापोटी २७ कोटींची थकबाकी, उरणमधील १४ ग्रामपंचायतीचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:13 IST

तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि ३५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या ग्रामपंचायतींकडून दाखवली जाते.

- मधुकर ठाकूरउरण : उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची डिसेंबर २०१९ अखेर पाणीबिलाची २७ कोटी ११ लाख १६ हजार ०६७ रुपये इतकी थकबाकी आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या जेएनपीटी आणि ओएनजीसी हद्दीतील १२ ग्रामपंचायती आघाडीवर आहेत. ग्रामपंचायतींकडे असलेल्या कोट्यवधींच्या थकबाकीमुळे मात्र एमआयडीसीच्या विकासकामांना खीळ बसली असल्याची माहिती उरण उपअभियंता रणजित बिरंजे यांनी दिली.तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि ३५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या ग्रामपंचायतींकडून दाखवली जाते.ग्रामपंचायतींकडील पाणीबिलांच्या थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्याकाठी आणि दरवर्षी वाढतच आहे.डिसेंबर २०१९ महिन्याअखेरपर्यंत तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची २७ कोटी ११ लाख १६ हजार ६७ रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांमध्ये नवीन शेवा- दोन कोटी ४० लाख ५३ हजार ५००, हनुमान कोळीवाडा- ३० लाख १६ हजार २१६, करळ - ६४ लाख २५ हजार २६२, धुतुम - ९१ लाख ३३ हजार २२२, जसखार - एक कोटी १६ लाख ७२ हजार ६३९, बोकडवीरा - एक कोटी ६३ लाख ६३ हजार २८०, फुंडे-दोन कोटी ३७ लाख ६७ हजार ८१२, सावरखार- ३३ लाख ९७ हजार १२८, डोंगरी - ४१ लाख ४८ हजार ६९८, सोनारी- ७८ लाख १२ हजार ५३, नागाव - एक कोटी एक लाख ६८ हजार २८८, चाणजे-पाच कोटी ४९ लाख ९२ हजार ३१२, चिर्ले-एक कोटी ६५ लाख नऊ हजार ७१४, केगाव - एक कोटी ५६ लाख ५६ हजार ८३, म्हातवली - ७२ लाख ५० हजार १८६, तेलीपाडा - दोन लाख ३२ हजार २८२ आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तर चिरनेर कनेक्शन - दोन कोटी ७२ लाख राच हजार ४९, खोपटा कनेक्शन- सहा लाख ४७ हजार ४४४, दिघोडे - एक कोटी २७ लाख ७२ हजार २७२, दादरपाडा- १७ लाख ६३ हजार ९१२, वेश्वी-एक कोटी नऊ लाख ९१ हजार ९०४, रांजणपाडा- चार लाख ४६ हजार १११, नवघर-२० लाख ६६ हजार ७७, पागोटे- सहा लाख २४ हजार ६२३ आदी थकबाकीदार आठ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा एमआयडीसीकडून याआधीच बंद करण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे थकबाकी कायम आहे.थकबाकीदारांना नोटीसथकबाकीदारांमध्ये जेएनपीटी हद्दीतील नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, डोंगरी, जसखार, सोनारी, करळ, सावरखार, बोकडवीरा या नऊ तर ओएनजीसी हद्दीतील नागाव, म्हातवली, चाणजे या तीन अशा एकूण आर्थिकदृष्ट्या सधन म्हणून ओळखल्या जाणाºया १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटिसाही बजावण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतरही ग्रामपंचायतींकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यात टाळाटाळ केली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी