शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पाणीबिलापोटी २७ कोटींची थकबाकी, उरणमधील १४ ग्रामपंचायतीचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:13 IST

तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि ३५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या ग्रामपंचायतींकडून दाखवली जाते.

- मधुकर ठाकूरउरण : उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची डिसेंबर २०१९ अखेर पाणीबिलाची २७ कोटी ११ लाख १६ हजार ०६७ रुपये इतकी थकबाकी आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या जेएनपीटी आणि ओएनजीसी हद्दीतील १२ ग्रामपंचायती आघाडीवर आहेत. ग्रामपंचायतींकडे असलेल्या कोट्यवधींच्या थकबाकीमुळे मात्र एमआयडीसीच्या विकासकामांना खीळ बसली असल्याची माहिती उरण उपअभियंता रणजित बिरंजे यांनी दिली.तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि ३५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या ग्रामपंचायतींकडून दाखवली जाते.ग्रामपंचायतींकडील पाणीबिलांच्या थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्याकाठी आणि दरवर्षी वाढतच आहे.डिसेंबर २०१९ महिन्याअखेरपर्यंत तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची २७ कोटी ११ लाख १६ हजार ६७ रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांमध्ये नवीन शेवा- दोन कोटी ४० लाख ५३ हजार ५००, हनुमान कोळीवाडा- ३० लाख १६ हजार २१६, करळ - ६४ लाख २५ हजार २६२, धुतुम - ९१ लाख ३३ हजार २२२, जसखार - एक कोटी १६ लाख ७२ हजार ६३९, बोकडवीरा - एक कोटी ६३ लाख ६३ हजार २८०, फुंडे-दोन कोटी ३७ लाख ६७ हजार ८१२, सावरखार- ३३ लाख ९७ हजार १२८, डोंगरी - ४१ लाख ४८ हजार ६९८, सोनारी- ७८ लाख १२ हजार ५३, नागाव - एक कोटी एक लाख ६८ हजार २८८, चाणजे-पाच कोटी ४९ लाख ९२ हजार ३१२, चिर्ले-एक कोटी ६५ लाख नऊ हजार ७१४, केगाव - एक कोटी ५६ लाख ५६ हजार ८३, म्हातवली - ७२ लाख ५० हजार १८६, तेलीपाडा - दोन लाख ३२ हजार २८२ आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तर चिरनेर कनेक्शन - दोन कोटी ७२ लाख राच हजार ४९, खोपटा कनेक्शन- सहा लाख ४७ हजार ४४४, दिघोडे - एक कोटी २७ लाख ७२ हजार २७२, दादरपाडा- १७ लाख ६३ हजार ९१२, वेश्वी-एक कोटी नऊ लाख ९१ हजार ९०४, रांजणपाडा- चार लाख ४६ हजार १११, नवघर-२० लाख ६६ हजार ७७, पागोटे- सहा लाख २४ हजार ६२३ आदी थकबाकीदार आठ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा एमआयडीसीकडून याआधीच बंद करण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे थकबाकी कायम आहे.थकबाकीदारांना नोटीसथकबाकीदारांमध्ये जेएनपीटी हद्दीतील नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, डोंगरी, जसखार, सोनारी, करळ, सावरखार, बोकडवीरा या नऊ तर ओएनजीसी हद्दीतील नागाव, म्हातवली, चाणजे या तीन अशा एकूण आर्थिकदृष्ट्या सधन म्हणून ओळखल्या जाणाºया १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटिसाही बजावण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतरही ग्रामपंचायतींकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यात टाळाटाळ केली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी