शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबिलापोटी २७ कोटींची थकबाकी, उरणमधील १४ ग्रामपंचायतीचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:13 IST

तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि ३५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या ग्रामपंचायतींकडून दाखवली जाते.

- मधुकर ठाकूरउरण : उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची डिसेंबर २०१९ अखेर पाणीबिलाची २७ कोटी ११ लाख १६ हजार ०६७ रुपये इतकी थकबाकी आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या जेएनपीटी आणि ओएनजीसी हद्दीतील १२ ग्रामपंचायती आघाडीवर आहेत. ग्रामपंचायतींकडे असलेल्या कोट्यवधींच्या थकबाकीमुळे मात्र एमआयडीसीच्या विकासकामांना खीळ बसली असल्याची माहिती उरण उपअभियंता रणजित बिरंजे यांनी दिली.तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि ३५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या ग्रामपंचायतींकडून दाखवली जाते.ग्रामपंचायतींकडील पाणीबिलांच्या थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्याकाठी आणि दरवर्षी वाढतच आहे.डिसेंबर २०१९ महिन्याअखेरपर्यंत तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची २७ कोटी ११ लाख १६ हजार ६७ रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांमध्ये नवीन शेवा- दोन कोटी ४० लाख ५३ हजार ५००, हनुमान कोळीवाडा- ३० लाख १६ हजार २१६, करळ - ६४ लाख २५ हजार २६२, धुतुम - ९१ लाख ३३ हजार २२२, जसखार - एक कोटी १६ लाख ७२ हजार ६३९, बोकडवीरा - एक कोटी ६३ लाख ६३ हजार २८०, फुंडे-दोन कोटी ३७ लाख ६७ हजार ८१२, सावरखार- ३३ लाख ९७ हजार १२८, डोंगरी - ४१ लाख ४८ हजार ६९८, सोनारी- ७८ लाख १२ हजार ५३, नागाव - एक कोटी एक लाख ६८ हजार २८८, चाणजे-पाच कोटी ४९ लाख ९२ हजार ३१२, चिर्ले-एक कोटी ६५ लाख नऊ हजार ७१४, केगाव - एक कोटी ५६ लाख ५६ हजार ८३, म्हातवली - ७२ लाख ५० हजार १८६, तेलीपाडा - दोन लाख ३२ हजार २८२ आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तर चिरनेर कनेक्शन - दोन कोटी ७२ लाख राच हजार ४९, खोपटा कनेक्शन- सहा लाख ४७ हजार ४४४, दिघोडे - एक कोटी २७ लाख ७२ हजार २७२, दादरपाडा- १७ लाख ६३ हजार ९१२, वेश्वी-एक कोटी नऊ लाख ९१ हजार ९०४, रांजणपाडा- चार लाख ४६ हजार १११, नवघर-२० लाख ६६ हजार ७७, पागोटे- सहा लाख २४ हजार ६२३ आदी थकबाकीदार आठ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा एमआयडीसीकडून याआधीच बंद करण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे थकबाकी कायम आहे.थकबाकीदारांना नोटीसथकबाकीदारांमध्ये जेएनपीटी हद्दीतील नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, डोंगरी, जसखार, सोनारी, करळ, सावरखार, बोकडवीरा या नऊ तर ओएनजीसी हद्दीतील नागाव, म्हातवली, चाणजे या तीन अशा एकूण आर्थिकदृष्ट्या सधन म्हणून ओळखल्या जाणाºया १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटिसाही बजावण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतरही ग्रामपंचायतींकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यात टाळाटाळ केली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी