शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वर्षभरात रस्ते अपघातात २५० जणांचा मृत्यू; ४९५ प्रवासी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:30 IST

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात घडलेल्या २३९ प्राणांतिक अपघातांमध्ये २५० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेले वर्षभर पोलिसांनी राबवलेल्या जनजागृती अभियानांमुळे २०१७ च्या तुलनेत गतवर्षी अपघातांमध्ये १५४ ची घट झाली आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात घडलेल्या २३९ प्राणांतिक अपघातांमध्ये २५० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेले वर्षभर पोलिसांनी राबवलेल्या जनजागृती अभियानांमुळे २०१७ च्या तुलनेत गतवर्षी अपघातांमध्ये १५४ ची घट झाली आहे. मात्र, काही मोठ्या अपघातांमुळे मृत्यूच्या संख्येत १९ ने वाढ झाली आहे.शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अतिवेगात वाहन चालवणे, अशा प्रकारांमुळे २०१७ मध्ये एकूण १२७२ अपघात घडले होते, त्यामध्ये सायन-पनवेल मार्गावरील नव्या उड्डाणपुलाच्या डांबरीकरणातील त्रुटीमुळे घडलेल्या अपघातासह पनवेल, उरण मार्गाच्या दुरवस्थेमुळे घडलेल्या गंभीर अपघातांचा समावेश होता. त्या ठिकाणी घडलेले बहुतांश अपघात पावसाळा दरम्यानचे आहेत. मात्र, २०१८ मध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण घटावे, यासाठी पोलिसांनी वर्षभर विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न केले, त्यामध्ये संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून खड्डे पडलेल्या रस्त्यांची डागडुजी करून घेण्यासह वाहनचालकांमध्ये जनजागृती अभियानांचाही समावेश होता. तसेच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईच्याही मोहिमा राबवण्यात आल्या. परिणामी, चालकांमध्ये बºया प्रमाणात जनजागृती झाल्याने तसेच रस्त्यांच्या परिस्थितीत सुधार घडू लागल्याने २०१७ च्या तुलनेत गतवर्षी अपघातांच्या संख्येत १५४ ने घट झाली आहे. २०१७ मध्ये घडलेल्या एकूण १२७२ अपघातांपैकी २२३ प्राणांतिक अपघातांमध्ये २३१ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, गतवर्षी एकूण १११८ अपघात घडले असून, त्यापैकी २३९ प्राणांतिक अपघातात २५० जणांना मृत्यूने कवटाळले आहे. त्यापैकी काही अपघात सायन-पनवेल मार्गावरील तसेच उरण मार्गावरील खड्ड्यांमुळे घडलेले आहेत. वर्षाखेरीस रस्ते सुरक्षा समितीने सातत्याने अपघात घडणाºया ठिकाणांना ब्लॅक स्पॉट घोषित करून त्या ठिकाणी आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. त्यामध्ये वाशी खाडीपुलाचाही समावेश होता. वर्षाखेरीस अपघातसदृश ठिकाणांवर दुरुस्तीकामे झाल्यानेही अपघातांना काही प्रमाणात आळा बसलेला आहे.बहुतांश अपघातांना रस्त्याच्या दुरवस्थेसह वाहन चालकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असतो. या दोन्ही बाबींमध्ये सुधार घडवण्याच्या उद्देशाने विद्यमान आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांसह दोन्ही परिमंडळाच्या पोलिसांकडून विविध उपक्रम राबवण्यात आले, त्यामुळे किरकोळ अपघातांनाही आळा बसला असून, २०१७ च्या तुलनेत गतवर्षी किरकोळ अपघातांच्या घटना १८३ ने कमी झाल्या आहेत. सायन -पनवेल मार्गावरील पुलांच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक नसल्यानेही अपघात घडले आहेत. त्यामध्ये सानपाडा, घणसोली, शिरवणे, सीबीडी आदी ठिकाणच्या पुलांचा समावेश आहे.वाशीत टेम्पोचा अपघातवाशीत टेम्पो दुभाजकाला धडकल्याची घटना सोमवारी रात्री वाशी सेक्टर १७ तेथे घडली. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याने मद्यपान केल्याचे पोलिसांना आढळून आले. सुदैवाने या वेळी रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. अन्यथा, टेम्पोचालकाच्या हलगर्जीमुळे इतरांना मृत्यूच्या दाढेखाली जावे लागले असते. याचदरम्यान, पामबीच मार्गावर नेरुळ येथे रिक्षाने बॅरिकेड्सला धडक दिल्याने अपघात झाला. सदर ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करून बॅरिकेड्स लावल्याचे रिक्षाचालकाच्या निदर्शनास आले नाही, यामुळे त्याने बॅरिकेड्सला धडक दिल्याने हा अपघात झाला असून, त्यामध्ये प्रवाशासह रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला आहे.रेल्वे अपघातात २५१ बळीशहरातील ट्रान्स हार्बर तसेच हार्बर मार्गावर रेल्वेच्या धडकेने तसेच रेल्वेतून पडून वर्षभरात २५१ जणांचा बळी गेला आहे. रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा प्रवाशांकडून दरवाजात उभे राहण्याला पसंती दिली जाते. गर्दीच्या वेळी त्यांची ही हौस जीवावर बेतल्याचे अनेक अपघातांमधून समोर आलेले आहे, तर रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक असतानाही अनेक ठिकाणी प्रवासी रुळावरून चालत स्थानकात जाताना दिसतात. परिणामी, अशांना रेल्वेच्या धडकेने मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. त्यानुसार गतवर्षी रेल्वे रुळावर झालेल्या मृतांमध्ये १७९ अपघात वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील आहेत. त्यामध्ये हार्बर मार्गावरील सीवूड ते गोवंडीपर्यंतच्या स्थानकांचा व ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी ते रबाळेपर्यंतच्या स्थानकांचा समावेश आहे. तर ७२ अपघात पनवेल रेल्वेपोलिसांच्या हद्दीतील असून, त्यामध्ये बेलापूर ते पनवेल व कळंबोलीपर्यंतच्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे. नागरिकांकडून रेल्वे रुळ ओलांडला जाऊ नये, याकरिता अनेक ठिकाणी रुळावर पादचारी पूल उभारण्याचेही काम सुरू आहे; परंतु रेल्वे प्रवाशांकडून शॉर्टकटला अधिक पसंती मिळत असल्याने हाच शॉर्टकट त्यांच्या जीवावर बेतत आहे.

टॅग्स :Accidentअपघात