शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

निम्मीच मते पडली, आता पाणीही तेवढेच मिळणार; भाजपा नेत्यांची महिलांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 14:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी व्हायब्रंट गुसरातचा नारा दिला होता. तसेच गुजरात कसे अग्रेसर आहे, गुजरातचा विकास याबाबत सांगत लोकांची मते जिंकली होती.

बडोदा : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान होण्यासाठी भाजपाच्या मंत्र्यांकडून मतदारांना धमकावण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. केंद्रीय मंत्री मेनका गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आता भाजपाच्याचगुजरातच्या मंत्र्याचे नाव या यादीमध्ये आले आहे. पाण्याचा प्रश्न घेऊन गेलेल्या महिलांना या मंत्र्याने मला तुम्ही 55 टक्केच मते दिली, पाणी तेवढेच मिळणार असे वक्तव्य केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी व्हायब्रंट गुसरातचा नारा दिला होता. तसेच गुजरात कसे अग्रेसर आहे, गुजरातचा विकास याबाबत सांगत लोकांची मते जिंकली होती. मात्र, यानंतर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पाटीदार आंदोलन आणि अन्य प्रश्नांवर कांग्रेसने चांगलीच लढत दिली होती. गुजरातवर भाजपाचा निसटता विजय झाला असला तरीही त्याची सल तेथील नेत्यांमध्ये असल्याचे दिसत आहे. भाजपाचे पाणी पुरवठा मंत्री कुंवरजी बावलिया हे त्यांच्या मतदारसंघात फिरत असताना तेथील महिलांनी आपल्याला पाणी मिळत नसल्याची तक्रार केली. यावर मला विधानसभेसाठी विनंती करूनही 55 टक्केच मते दिलीत, असे प्रत्यूत्तर दिले. यावर भाजपाचे माजी आमदार भरत बोघारा यांनी पुढे बोलत 'आता तुम्हाला तेवढेच पाणी मिळेल', अशी धमकी दिली. 

गुजरातच्या मंत्र्यांचा याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गेल्या आठवड्यात भाजपाच्या केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी मुस्लिमांना मतदान करण्यासाठी धमकावले होते. तर रविवारी एका सभेमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बेरोजगार तरुणांना उद्देशून बॅनर खाली करा नाहीतर आयुष्यभर बेरोजगार रहाल, अशी धमकी दिली होती. त्या आधी भाजपाचेच खासदार साक्षी महाराज यांनी मतदान न केल्यास साधूचा शाप लागेल, अशी धमकी उपस्थितांना दिली होती. 

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरातGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019