शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

यूपीत पुन्हा योगी सरकार, पंजाबमध्ये ‘आप’चा डंका; काँग्रेसला चिंतेत टाकणारा निवडणुकीचा सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 20:42 IST

उत्तर प्रदेशातील ४५ टक्के लोक भाजपा, योगी सरकारच्या कामकाजावर समाधानी आहेत. तर ३४ टक्के जनता नाराज आहे. लोकशाहीत सरकार इतकीच विरोधकांनी भूमिका महत्त्वाची मानली जाते

ठळक मुद्देपंजाबमध्ये १८ टक्के लोक कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास इच्छुक आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याच्या कामकाजावर ३६ टक्के जनतेने समाधान व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशातील ४५ टक्के लोक भाजपा, योगी सरकारच्या कामकाजावर समाधानी आहेत

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर याठिकाणी पुढील वर्षी २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राज्यात कुणाचं सरकार येईल याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. एबीपी न्यूज सी वोटरनं (ABP C voter Survey) याबाबत एक सर्व्हे केला आहे. ज्यात उत्तर प्रदेशातभाजपाचा दणदणीत विजय मिळताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात २५९ ते २६७ जागांवर भाजपा विजयी होईल असा दावा यात करण्यात आला आहे. तर समाजवादी पक्षाला १०९-११७ जागा मिळण्याची शक्यता आहे. बीएसपी १२-१६, काँग्रेस ३-७ आणि इतरांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील ४५ टक्के लोक भाजपा, योगी सरकारच्या कामकाजावर समाधानी आहेत. तर ३४ टक्के जनता नाराज आहे. लोकशाहीत सरकार इतकीच विरोधकांनी भूमिका महत्त्वाची मानली जाते. अशावेळी लोकांना विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका योग्यपणे निभावली का? असा प्रश्न करण्यात आला त्यावर ४० टक्के लोकांनी विरोधकांच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले तर ३४ टक्के जनता असमाधानी असल्याचं समोर आलं.

तर उत्तर प्रदेशच्या शेजारील उत्तराखंडमध्येही पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याठिकाणी ४४ ते ४८ जागा भाजपा जिंकतील, काँग्रेस १९ ते २३, आम आदमी पार्टी ० ते ४ तर इतरांना ०-२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याच्या कामकाजावर ३६ टक्के जनतेने समाधान व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ३८-४६ जागा मिळण्याची आशंका आहे. तर अरविंद केजरीवालांच्या आपला ५१ ते ५७ जागा मिळतील असा अंदाज आहे.

सर्व्हेनुसार, पंजाबमध्ये १८ टक्के लोक कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास इच्छुक आहे. तर २२ टक्के लोक अरविंद केजरीवाल, १९ टक्के सुखबीर बादल तर १६ टक्के भगवंत मान आणि १५ टक्के नवज्योत सिंग सिद्धु आणि १० टक्के अन्य चेहऱ्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती देत आहेत. तर गोवा इथं भाजपाला ३९ टक्के, काँग्रेस १५ टक्के, आप २२ टक्के आणि अन्य २४ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचा बोलबोला दिसेल. भाजपाच्या खात्यात २२ ते २६ जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीला ४-८ जागा मिळतील तर इतरांना ३-७ जागा मिळण्याची शक्यता आहे. मणिपूर इथं भाजपाच्या खात्यात ४० टक्के मतदान होईल असा अंदाज आहे. त्याशिवाय काँग्रेसला ३५ टक्के, एनपीएफ ६ टक्के आणि इतरांना १७ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाAAPआपUttar Pradeshउत्तर प्रदेशPunjabपंजाबgoaगोवा