शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

'योगी आदित्यनाथांनी मंदिरांचा दौरा करण्याऐवजी लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 3:11 PM

गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (बीआरडी) 48 तासात 30 बाळांचा मृत्यू झाला आहे

लखनऊ -  गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (बीआरडी) 48 तासात 30 बाळांचा मृत्यू झाला आहे. डिपोर्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसीनचे प्रमुख डॉ डी के श्रीवास्तव यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. 'मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 15 बाळांना एक महिनाही पुर्ण झाला नव्हता. उर्वरित 15 बाळांपैकी सहाजण ज्यांना एक महिना पुर्ण झाला होता त्यांचा मेंदूला सूज आल्याने मृत्यू झाला. तर इतरांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला', अशी माहिती  डॉ डी के श्रीवास्तव यांनी दिली आहे. 

याआधीही गोरखपूर हॉस्पिटल चर्चेत आलं होतं, जेव्हा फक्त सहा दिवसांत 60 मुलांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर समाजवादी पक्षाने योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करत निषेध नोंदवला आहे. 

समाजवादी पक्षाचे प्रवक्ता सुनील यादव बोलले आहेत की, 'गोरखपूरमध्ये अशी घटना होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या घटनेनंतरही राज्य सरकारने चौकशी करण्यासाठी कोणताही आदेश दिला नसून, काहीच हालचाल करताना दिसत नाहीयेत. सरकार निष्क्रीय असल्याचं पाहून दुख: होतंय. सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याऐवजी सरकार शांत बसून सर्व पाहत आहे'.

'राज्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळांचा दौरा करण्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांनी गंभीरपणे लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याकडे त्यांनी लक्ष द्यावं', असं सुनील यादव बोलले आहेत. 

बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या महिन्यात चार दिवसांमध्ये ६९ मुलांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या नोंदीनुसार १० ऑक्टोबर रोजी १९, नऊ तारखेला १८, आठ तारखेला २० आणि १२ मुलांचा मृत्यू ७ ऑक्टोबरला झाला.

ऑगस्टमध्ये २९० बालमृत्यू झाले. त्यापैकी एका दिवसात ६० मुलांचा मृत्यू झाला होता. मुलांना प्राणवायू न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या रुग्णालयाला प्राणवायूच्या सिलिंडरचा पुरवठा करणाºयाचे बिल दिले न गेल्यामुळे त्याने पुरवठा थांबवला, असाही आरोप आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला व चौकशीही झाली. आॅक्सिजन पुरवठादाराला अटकही झाली होती.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथGorakhpurगोरखपूर