शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2022: “शेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाही, ३५० जागा जिंकून मी पुन्हा येईन”: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:04 IST

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५० जागा जिंकेल आणि मी पुन्हा येईन, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

ठळक मुद्देपुन्हा जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहेशेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाहीभाजप रेकॉर्ड तोडत ३२५ ते ३५० जागा जिंकेल

लखनऊ:उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण आणखी तापताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० महिन्यांपासून आंदोलन सुरू असून, अलीकडेच पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात उत्तर प्रदेशमधील ८०० ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यातच या शक्यता खोडून काढत शेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५० जागा जिंकेल आणि मी पुन्हा येईन, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. (yogi adityanath says opposition faces credibility crisis bjp will get 325 350 seats)

आगामी निवडणुकीत राज्यात भाजपा सहजच जिंकेल. भाजप फक्त जिंकणारच नाही, तर २०१७ मध्ये ३१२ जागा जिंकण्याचा रेकॉर्ड तोडत ३२५ ते ३५० जागा जिंकेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंतची राज्य सरकारची कामगिरी, आर्थिक विकास, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहूनच पुन्हा एकदा विजय प्राप्त होईल. सरकारच्या कारभाराच्या रेकॉर्डवर लक्ष केंद्रित करून आणि जातीय समीकरणाचा समतोल साधून कोणत्याही सत्ताविरोधावर मात करता येऊ शकेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

पुन्हा जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहे

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीवर कोणताही प्रभाव पडणार नाही. मला पुन्हा जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. उत्तर प्रदेशची राजकीय गतिशीलता चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो, कारण गेल्या २३ वर्षांपासून राज्याच्या सक्रिय राजकारणात आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांची राजकीय समज आणि परिपक्वतेबद्दल विश्वास आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. ते हिंदुस्थान टाइम्सशी बोलत होते. 

दरम्यान, भाजपने आरपीआयशी युती करून आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढली पाहिजे. भाजपाने आम्हाला १० ते १२ जागा द्याव्यात. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला असून, भाजपाने आमच्यासोबत निवडणूक लढवली तर बसपाला मोठा धक्का बसेल असे सांगितले आहे, अशी ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अलीकडेच दिल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण