शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

UP Election 2022: “शेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाही, ३५० जागा जिंकून मी पुन्हा येईन”: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:04 IST

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५० जागा जिंकेल आणि मी पुन्हा येईन, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

ठळक मुद्देपुन्हा जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहेशेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाहीभाजप रेकॉर्ड तोडत ३२५ ते ३५० जागा जिंकेल

लखनऊ:उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण आणखी तापताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० महिन्यांपासून आंदोलन सुरू असून, अलीकडेच पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात उत्तर प्रदेशमधील ८०० ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यातच या शक्यता खोडून काढत शेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५० जागा जिंकेल आणि मी पुन्हा येईन, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. (yogi adityanath says opposition faces credibility crisis bjp will get 325 350 seats)

आगामी निवडणुकीत राज्यात भाजपा सहजच जिंकेल. भाजप फक्त जिंकणारच नाही, तर २०१७ मध्ये ३१२ जागा जिंकण्याचा रेकॉर्ड तोडत ३२५ ते ३५० जागा जिंकेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंतची राज्य सरकारची कामगिरी, आर्थिक विकास, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहूनच पुन्हा एकदा विजय प्राप्त होईल. सरकारच्या कारभाराच्या रेकॉर्डवर लक्ष केंद्रित करून आणि जातीय समीकरणाचा समतोल साधून कोणत्याही सत्ताविरोधावर मात करता येऊ शकेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

पुन्हा जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहे

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीवर कोणताही प्रभाव पडणार नाही. मला पुन्हा जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. उत्तर प्रदेशची राजकीय गतिशीलता चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो, कारण गेल्या २३ वर्षांपासून राज्याच्या सक्रिय राजकारणात आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांची राजकीय समज आणि परिपक्वतेबद्दल विश्वास आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. ते हिंदुस्थान टाइम्सशी बोलत होते. 

दरम्यान, भाजपने आरपीआयशी युती करून आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढली पाहिजे. भाजपाने आम्हाला १० ते १२ जागा द्याव्यात. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला असून, भाजपाने आमच्यासोबत निवडणूक लढवली तर बसपाला मोठा धक्का बसेल असे सांगितले आहे, अशी ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अलीकडेच दिल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण