शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता बनवणारी हिंदू युवा वाहिनी मोजतेय अखेरच्या घटका, अनेक पदाधिकारी सपामध्ये दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:02 IST

Hindu Yuva Vahini News: Yogi Adityanath यांनी उत्तर प्रदेशच्या राजकाणार मोठी झेप घेतली आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून घडवणारी हिंदू युवा वाहिनी ही संघटना मात्र अखेरच्या घटका मोजत आहे.

गोरखपूर - उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना भाजपाने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या राजकाणार मोठी झेप घेतली आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून घडवणारी हिंदू युवा वाहिनी ही संघटना मात्र अखेरच्या घटका मोजत आहे. तसेच या संघटनेतील बहुतांश पदाधिकारी हे समाजवादी पक्षात गेले आहेत. तर या संघटनेकडे लक्ष देणारा कुणीही उरलेला नाही. योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनीची स्थापना २००२ मध्ये केली होती. राष्ट्रविरोधी कृत्यांना रोखणे हे या संघटनेचे उद्दीष्ट होते. २००७ मध्ये योगी आदित्यनाथ यांना ११ दिवस तुरुंगातही राहावे लागले होते. हिंदू युवा वाहिनीचे वर्चस्व आहे.

हिंदू युवा वाहिनीचे अध्यक्ष असलेल्या सुनील सिंह आणि त्यांच्यासोबत सौरभ विश्वकर्मा, चंदन विश्वकर्मा यांनी १५ वर्षांपर्यंत हिंदुत्वाचा झेंडा हिंदू युवा वाहिनीने उचलून धरला होता. मात्र २०१७च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटपादरम्यान त्यांचे योगी आदित्यनाथ यांच्याशी मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांनी संघटनेच्या बाहेर काढले होते. आता हे तिन्ही नेते समाजवादी पक्षात दाखल झाले आहेत.

हिंदू युवा वाहिनीच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ हे सीएम बनल्यानंतर हिंदू युवा वाहिनीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले. हळुहळू जिल्हा कार्यकारिणी भंग करण्यात आली. त्यामुळे सर्व कार्यकर्ते हे समाजवादी पक्षात जाऊ लागले. या क्रमामध्ये २०१८ मध्ये उत्तर प्रदेशमधील बलरामपूर, मऊ, आझमगड या जिल्ह्यांमधील कार्यकारिणी भंग करण्यात आल्या. या भागांमध्ये या संघटनेची भक्कम जाळे होते.  

 आरएसएसच्या आदेशांनुसार हिंदू युवा वाहिनीला भंग करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यापासून या संस्थेच्या विस्ताराला ब्रेक लागला होता. तसेच समांतर हिंदुत्ववादी संघटना भविष्यात पक्षासाठी डोकेदुखी ठरली असती, त्यामुळे ही संघटना आटोपती घेण्यात आल्याची चर्चा आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाGorakhpurगोरखपूरHindutvaहिंदुत्व