शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Yogi Adityanath, Congress: "योगीजी, भगवे कपडे घालू नका, आता तुम्ही..."; काँग्रेसच्या Hussain Dalwai नी दिला अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 17:11 IST

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर असतानाच केलं विधान

Yogi Adityanath, Congress: काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भगव्या कपड्यांवर त्यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान हुसेन दलवाई यांनी हे वक्तव्य केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. पुढील महिन्यात लखनौ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटसाठी देशातील बड्या उद्योगपतींना आमंत्रित करण्यासाठी ते मुंबईत पोहोचले आहेत. या दरम्यान, काँग्रेसचे हुसेन दलवाई यांनी योगींच्याबाबतीत एक विधान केलं आहे.

"योगीजी, आदित्यनाथ तुम्ही कायम भगवे कपडे घालता. पण आता तुम्ही थोडं बदलायला हवं. तुम्ही रोज दररोज धर्माबद्दल बोलू नका, भगवे कपडे घालू नका. नवीन विचार आचरणात आला, थोडे आधुनिक कपडे परिधान करा आणि आधुनिक विचारांचा अवलंब करावा," असे दलवाई म्हणाले. "योगींनी महाराष्ट्रातून उद्योग नेण्याऐवजी राज्यात नवीन उद्योग विकसित करावेत. महाराष्ट्राने उद्योगांसाठी चांगल्या सुविधा दिल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातून उद्योग घेण्याऐवजी राज्यात नवीन उद्योग विकसित करा. उद्योग हे आधुनिकतेचे प्रतीक असल्याने मुख्यमंत्र्यांनी थोडी आधुनिकता स्वत:मध्येही आणली पाहिजे," असेही दलवाई म्हणाले.

या दरम्यान मुंबईत पोहोचलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, त्यांच्या राज्यातील लोकांना आता 'उत्तर प्रदेशचे रहिवासी' असल्याचा अभिमान वाटतो. पाच वर्षांपूर्वी पर्यंत ही परिस्थिती अशी नव्हती. मुंबईत स्थायिक झालेल्या उत्तर प्रदेशातील लोकांना संबोधित करताना योगी म्हणाले, "पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशचे लोक देशात किंवा परदेशात कुठेही आपली ओळख सहसा उघड करत नव्हते, ते त्यांचे मूळ गाव वगैरे लपवत होते. आपल्या जन्मभूमीबद्दलही बोलत नव्हते. पण आता राज्यातील लोकांना त्यांच्या जन्मभूमीचा अभिमान वाटतो याचा मला आनंद आहे. आता लोकांना लाज किंवा संकोच वाटत नाही. ते स्वतःला उत्तर प्रदेशचे रहिवासी म्हणवतात. म्हणूनच उत्तर प्रदेशातील २०२२च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपा सलग दुसऱ्यांदा राज्यात सत्तेवर आला."

"राज्यात पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतर पक्ष दोन तृतीयांश बहुमताने सत्तेत परतला असे हे पहिल्यांदाच घडले आहे. माझ्या सरकारने केलेल्या कामामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झाले. उत्तर प्रदेश सरकारने गेल्या पाच वर्षांत प्रत्येक भागातील लोकांच्या कल्याणासाठी काम केले आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेत आहोत," असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसMumbaiमुंबईUttar Pradeshउत्तर प्रदेश