शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:00 IST

Baba Ramdev on Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरुनच आता योगगुरू बाबा रामदेव यांनीही आव्हाडांवर टीकास्त्र सोडले आहे. हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक धर्मावर कलंक लावण्याचे काम करत आहेत, असे रामदेव बाबा म्हणाले आहेत. 

माध्यमांशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक धर्मावर कलंक लावण्याचे काम करत आहेत. ज्या धर्मात आणि संस्कृतीत त्यांचा जन्म झाला, ज्या पूर्वजांचे ते वंशज आहेत, त्यांनाच ते हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद बोलत आहेत. पण मतांसाठी भगवा दहशतवाद नाही, असे सांगतात. जेव्हा एखादा प्रसंग येतो, त्यावेळी असेही म्हणतात की, दहशदवाद्याला धर्म नसतो. परंतु, हिंदू, हिंदुत्व आणि सनातन धर्माला दहशतवादाशी जोडून सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण केला जात आहे. शिवाय, ते देशाच्या संविधानच्या भावनेच्या विरोधात काम करत आहेत. ईश्वर त्यांना बुद्धी देवो आणि लवकरच त्यांना राजकारणातून मोक्ष मिळावा, अशी प्रार्थना करतो."

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

"सनातन धर्म नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नव्हती, तो केवळ एक विचारसरणी आहे ज्यामुळे भारताचे नुकसान झाले. आम्ही हिंदू धर्माचे अनुयायी आहोत, तथाकथित सनातन धर्माचे नव्हे. सनातन धर्माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात अडथळा निर्माण केला, संभाजी महाराजांची बदनामी केली, ज्योतिराव फुले यांच्या हत्येचा प्रयत्न केला आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण व माती फेकली. शाहू महाराजांच्या हत्येचा कटदेखील सनातन धर्माने रचला होता", असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस