शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

यशवंत सिन्हा यांचे वक्तव्य योग्यच, पक्षातूनच भाजपाला होऊ लागला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 14:41 IST

केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीवर भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी टीका केली होती. यशवंत सिंन्हाच्या या वक्तव्याला आता भाजपमधूनच पाठिंबा मिळू लागल्याने पक्षाची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीवर भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी टीका केली होती. यशवंत सिंन्हाच्या या वक्तव्याला आता भाजपमधूनच पाठिंबा मिळू लागल्याने पक्षाची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे. यशवंत सिन्हा यांचे वक्तव्य हे अत्यंत योग्य असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे. देशाच्या आर्थिक स्थितीचे यशवंत सिन्हा यांनी योग्य वर्णण केले आहे आणि याच्यातून देशाचे कारभारी काही धडा घेतील अशी अपेक्षाही शुत्रघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. 

अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका ज्येष्ठ भाजपानेते यशवंत सिन्हा यांनी केली होती.

नरेंद्र मोदींनी पक्षापेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे असे वक्तव्य केले होते. त्याच अर्थाने यशवंत सिन्हा यांच्या वक्तव्याकडे बघितले जाईल अशी अपेक्षाही शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही निर्णयामुळे आधीच टीकेचे धनी झालेले मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले. यशवंत सिन्हांच्या टीकेवर प्रश्नांचा भडीमार झाल्याने राजनाथसिंह आणि रविशंकर प्रसाद यांची कशी भंभेरी उडाली हे काल सगळ्या देशाने पाहिले.

टॅग्स :BJPभाजपाShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा