शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, ४५ वर्षांचा विक्रम मोडला;केजरीवालांनी बोलावली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 14:41 IST

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: उत्तर भारतात मुसळधार पावसामुळं महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे.  

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यातही दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडेल आणि १५-१६ तारखेला पावसाचा यलो अलर्ट आहे. यमुनेच्या वाढत्या जलपातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. आज दुपारी २ वाजता नदीची पाणीपातळी २०७.५५ मीटरवर पोहोचली. यापूर्वी १९७८ मध्ये नदीची पाणीपातळी २०७.४९ मीटरवर पोहोचली होती. यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे दिल्लीतील लोकांच्या अडचणी वाढत आहेत. नदीचे पाणी नोएडा-दिल्ली लिंक रोडपर्यंत पोहोचले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.

गेल्या २४ तासांत आणखी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ८ मृत्यू उत्तराखंडमध्ये तर चार मृत्यू यूपीमध्ये झाले आहेत. हिमाचलमध्ये तीन दिवसांत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्ग, मनाली-लेह, मनाली-चंदीगड राष्ट्रीय महामार्गासह १५०० हून अधिक रस्ते भूस्खलनामुळे बंद झाले आहेत. हरियाणा आणि पंजाबमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये अनेक घरे पाण्याखाली गेली असून पिकांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुपनगर, पटियाला, मोहाली, अंबाला आणि पंचकुला यासह बाधित जिल्ह्यांमध्ये मदतीसाठी केंद्र उभारण्यात आली आहेत. पंजाबमधील सर्वाधिक प्रभावित रुपनगर जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, यमुना खोऱ्यातून बाहेर काढलेल्यांसाठी चिल्ला ते एनएच २४ डीएनडी ते निजामुद्दीन फ्लायओव्हर आणि यमुना बँक ते आयटीओ ब्रिजपर्यंत मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. येथे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. मदत गटांनी वैद्यकीय शिबिरेही लावली आहेत. रात्री बाहेर काढलेल्या लोकांना सकाळी नऊच्या सुमारास येथे जेवण देण्यात आले आणि दुपारी दीडच्या सुमारास तंबू उभारण्यात आले. नोएडा-दिल्ली लिंक रोडवर सुमारे १००० मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. याठिकाणी फिरती शौचालये बसविण्याची तयारी सुरु केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसdelhiदिल्लीriverनदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालHimachal Pradeshहिमाचल प्रदेश