शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील 'हिंदू' शब्द, तर अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतील 'मुस्लिम' शब्द हटवणार नाही- नक्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:35 IST

गेल्या काही दिवसांपासून बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील हिंदू शब्द आणि अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीतील मुस्लिम शब्द हटवण्यासाठी यूजीसी पॅनलनं शिफारस केली होती.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील हिंदू शब्द आणि अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीतील मुस्लिम शब्द हटवण्यासाठी यूजीसी पॅनलनं शिफारस केली होती. परंतु केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यूजीसीची ही मागणी फेटाळून लावली आहे.यूजीसी पॅनलनं दोन्ही केंद्रीय विश्वविद्यापीठांचा धर्मनिरपेक्ष स्तर कायम ठेवण्यासाठी हिंदू व मुस्लिम शब्द हटवण्यास सांगितलं होतं. मात्र केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वींनी ही शिफारस फेटाळत नावात कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.नक्वी म्हणाले, हिंदू व मुस्लिम शब्दांचा सांप्रदायिकतेशी कोणताही संबंध नाही. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यूजीसी पॅनलची शिफारस फेटाळली असून, धर्मनिरपेक्ष असण्यासाठी हिंदू व मुस्लिम शब्द महत्त्वाचे नाहीत. लोकांनी अशा प्रकारची चिंता करू नये, असा सल्लाही मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिला आहे.  

गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी भाजपा सरकारला अडचणी आणणारे वक्तव्य केले होते. 'देशात अल्पसंख्याकांना कधी कधी दुय्यम नागरिक असल्यासारखे वाटते', असे म्हणत मुख्तार अब्बास नक्वी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला होता. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांनी हे विधान केलं होतं.शेजारच्या देशांवर नजर टाकली तर, अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी भारत हा आदर्श देश असल्याचे लक्षात येईल. देशाच्या राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले असले तरी त्यामध्ये काहीतरी उणिवा जाणवतात. त्यामुळे कधी कधी आम्हाला या देशाचे दुय्यम नागरिक असल्यासारखे वाटते. अनेकदा मूळ प्रश्नांना मूठमाती दिली जाते, असे नक्वी म्हणाले होते. त्यानंतर या प्रकरणात नक्वींनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.'माझे हे विधान सामाजिक परिस्थितीला नव्हे तर व्होटबँकेच्या राजकारणाला धरून होते', अशी सारवासारव नक्वींनी केली होती. तसंच देशातील अल्पसंख्याकांना देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. कडव्या विचारसणीच्या लोकांना महत्त्व न देत त्यांनी ते सिद्ध करुन दाखवले आहे, असे नक्वी म्हणाले होते.  

टॅग्स :BJPभाजपा