शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

हिवाळी अधिवेशन: सातारकरांसाठी पहिल्याच दिवशी श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत उचलला 'हा' मुद्दा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 14:27 IST

शरद पवारांचे जीवलग मित्र म्हणून महाराष्ट्रात पाटील यांची ओळख आहे.

नवी दिल्ली - खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. अवघ्या तीन महिन्यात त्यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनश्रीनिवास पाटील तर भाजपाकडून उदयनराजे भोसले उभे होते. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. 

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी खासदारकीची शपथ घेतली. श्रीनिवास पाटील यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी लोसभेत एक मुद्दा मांडला. महाराष्ट्रातले खासदार, विशेषतः शिवसेनेचे खासदार शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित करत असताना श्रीनिवास पाटीलही याच मुद्यावर बोलायला उभे राहतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. 

पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी श्रीनिवास पाटील यांचं स्वागत केलं. अनेक दिवसांनंतर तुम्हाला ऐकण्याची संधी या सभागृहाला मिळाली आहे, असं म्हणत त्यांनी श्रीनिवास पाटील याचं स्वागत केलं. पाटील यांनी मग पीठासीन अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि म्हणाले की देशात केंद्रीय विद्यालयांची संख्या जर पाहिली तर सगळ्यात कमी संख्या ही महाराष्ट्रात आहे. सातारा जिल्ह्यात अनेक आजी-माजी लष्करी अधिकारी आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना लष्करात जाण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी सातारा जिल्ह्यात कुठेही एक केंद्रीय विद्यालय सुरू करण्यात यावं, ही नम्र विनंती करतो  असं म्हणत त्यांनी आपलं लहानसं भाषण संपवलं. 

शरद पवारांचे जीवलग मित्र म्हणून महाराष्ट्रात पाटील यांची ओळख आहे. पाटील हे यापूर्वीही दोनवेळा खासदार राहिले असून सिक्कीमचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी विकासाची कामं करण्यासाठी पक्षांतर करत असल्याचे म्हटले होते. परंतु हे सबळ कारण नव्हते. सर्वसामान्य जनतेने तीन वेळा निवडून देऊनही त्यांच्या हाताला काम नव्हते. याचाच राग लोकांच्या मनात होता. त्यामुळे पर्यायी उमेदवार मिळावा आणि त्याला आपण मत द्यावं अशी उर्मी तरुणांच्या आणि अनुभवी लोकांच्या मनात होती. त्यामुळे मी बहुमताने निवडून आलो, असे पाटील यांनी आपल्या विजयानंतर म्हटले होते. दरम्यान, उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात केलेला प्रवेश लोकांना रुचला नाही. तसेच, शरद पवारांची पावसातील सभा साताऱ्यातील निवडणुकीत निर्णायक ठरल्याचंही अनेकांच मत आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाShrinivas Patilश्रीनिवास पाटील