शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'देशात बदलाचे वारे, मतभेद बाजुला ठेवून काम करा', खर्गेंचा पक्षातील नेत्यांना विजयमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 19:04 IST

'आपल्याला 18 ते 25 वयोगटातील मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यांना आपली विचारधारा, इतिहास आणि आपले कार्य सांगावे लागेल.'

हैदराबाद: हैदराबादमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रविवारी संपली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही सहभागी झाल्या होत्या. सभेच्या समारोपीय भाषणात खर्गे यांनी कार्यकर्त्यांना व नेत्यांना विश्रांती न घेता काम करण्याचा सल्ला दिला. 

केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यासाठी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचे हैदराबादमध्ये आयोजन करण्यात आले. यावेली अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकजूटीने काम करण्याचा सल्ला दिला. काँग्रेसच्या यशाला प्राधान्य द्या आणि पक्षाचे नुकसान होईल असे काहीही करू नये, असे ते यावेळी म्हणाले.

खर्गेंनी काँग्रेस नेत्यांना आगामी निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन करताना म्हटले की, देशात परिवर्तनाची चिन्हे दिसत आहेत, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल याचा पुरावा आहेत. सर्वप्रथम पीसीसी, डीसीसी आणि ब्लॉक कमिटी बनवण्याचे काम पूर्ण करा. यात काही अडचण असेल तर संघटनेच्या सरचिटणीसांना भेटा, आम्हाला भेटा, आम्ही तोडगा काढू. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीपर्यंत तयारी ठेवावी लागणार आहे.

नेते व कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देत खर्गे म्हणाले की, आपल्याला 18 ते 25 वयोगटातील मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यांना आपली विचारधारा, इतिहास आणि आपले कार्य सांगावे लागेल. पक्षाची विचारधारा देशाच्या तरुण पिढीपर्यंत पोचवणाऱ्या तरुण वक्त्यांची संपूर्ण फौज तयार करायला हवी. प्रत्येक भागातील मतदार यादीची छाननी करावी लागणार आहे. त्यासाठी संघटनेच्या सरचिटणीसांनी आढावा बैठक बोलवावी. येत्या काही दिवसांत बूथपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या कार्यक्रमांची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल. 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेhyderabad-pcहैदराबादRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा