शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 19:45 IST

Haryana Assembly Election 2024:

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा अनपेक्षित धक्का बसला होता. या धक्क्यामधून काँग्रेस पक्ष अद्याप सावरलेला नाही. दरम्यान, हरयाणातील निवडणुकीचा निकाल बदलेल, २० जागांवर बाजी पलटेल, अशी आशा असलेल्या काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नवी आणि सुधारित माहिती असलेलं पत्रक घेऊन धाव घेतली आहे. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश हे मतमोजणीच्या दिवसापासूनच सक्रियपणे आपली भूमिका मांडत आहेत.  

जयराम रमेश यांनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलेल पत्रक शेअर केलं आहे.  हे पत्र शेअर करताना जयराम रमेश लिहितात की, ९ ऑक्टोबर निवडणूक आयोगाकडे उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आणि दिलेल्या पत्रकानंतर आम्ही आता हरयाणामधील २० विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेमध्ये गंभीर आणि स्पष्ट अनियमितता समोर आणली आहे. तसेच त्यावर आधारित सुधारित पत्रक निवडणूक आयोगाला दिलं आहे. आता निवडणूक आयोग यावर लक्ष देऊन योग्य आदेश देईल, अशी अपेक्षा आहे.  

काँग्रेसने आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्रकामधून २० मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप केला आहे. त्या २० विधानसभा मतदारसंघांमध्ये नारनौल, करनाल, डबवाली, रेवाडी, होडल, कालका, पानिपत सिटी, इंद्री, बडखल, फरिदाबाद एनआयटी, नलवा, रनिया, पटोदी, पलवल, बल्लभगड, बरवाला, उंचा कलां, घरौंदा, कोसली आणि बादशाहपूर विदानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पराभव समोर दिसू लागताच काँग्रेसने ईव्हीएम आणि त्यामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरींबाबत शंका उपस्थित केली होती. तसेच निवडणूक आयोगाकडून निकालाची माहिती संथगतीने दिली जात असल्याचाही आरोप केला होता. जयराम रमेश, सुप्रिया श्रीनेत आणि पवन खेडा यांनी याबाबत आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडली होती. तसेच काँग्रेसचे हरयाणातील नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला होता.  

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग