शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Delhi Violence: 'कोणालाही सोडणार नाही मग तो...', अमित शाहांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 8:48 PM

Delhi Violence: अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी आतापर्यंत ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देराजधानी दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी लोकसभेत चर्चा झाली.'दंगल घडवण्यासाठी ३०० हून अधिक लोक यूपीमधून आले होते.''२७ फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत ७०० एफआयआर दाखल झाल्या आहेत'

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी लोकसभेत चर्चा झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच, दिल्ली दंगलीसाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मग, तो कोणत्याही समाजाचा असो किंवा पार्टीचा, सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

सीएएवरून ईशान्य दिल्लीत दंगली उसळली. काही तासांत दिल्लीत दंगल उसळली. इतक्या कमी वेळात कुठल्याही कटाशिवाय दंगल उसळू शकत नाही. दंगल घडवण्यासाठी ३०० हून अधिक लोक यूपीमधून आले होते. या दंगल प्रकरणी कटकारस्थान रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दिशेने तपास सुरू असून याप्रकरणी कारवाई करताना कुठल्याही निष्पापावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचे अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.

याचबरोबर, अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी आतापर्यंत ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १५३ शस्त्र जप्त केली गेली आहेत. तसंच शांतता प्रस्थापित करण्यासाठी २५ फेब्रुवारीपासून ६५० बैठका घेण्यात आल्या आहेत. दिल्ली दंगल प्रकरणी एकूण २, ६४७ जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी काहींना अटकही केली गेली. २७ फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत ७०० एफआयआर दाखल झाल्या आहेत, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

याशिवाय, अमित शाह म्हणाले की, "मी दंगलीत झालेल्या नुकसानाची आकडेवारी सादर करू शकतो. पण त्यामध्ये हिंदू किंवा मुस्लिम असा भेदभाव करू शकत नाही. तुम्हीसुद्धा असे काही करू नका. दंगलीत किती मुस्लिमांचे नुकसान झाले, किती हिंदूंचे नुकसान झाले ही काही विचारण्याची पद्धत नाही. या दंगलीत ज्यांचे नुकसान झाले ते सर्व भारतीय आहेत. दिल्लीत झालेल्या या दंगलीत ५२ भारतीयांचा मृत्यू झाला. तर ५२६ भारतीय जखमी झाले. तसेच ३०० अधिक भारतीयांची घरे जाळली गेली." 

टॅग्स :Amit Shahअमित शहाdelhi violenceदिल्ली