शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

...तोपर्यंत कामावर परणार नाही, काश्मिरी पंडित मोदी सरकारवर संतप्त, पुकारले तीव्र आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 15:02 IST

Kashmiri Pandits: काश्मीरमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टार्गेट किलिंगमुळे सर्व काश्मिरी पंडित कर्मचारी पलायन करून जम्मूमध्ये पोहोचले होते. तेव्हापासून ते त्यांच्या संरक्षणाची निश्चिती करण्याची मागणी करत सातत्याने आंदोलन करत आहेत.

जम्मू - काश्मीरमध्ये पीएम पॅकेजअंतर्गत नोकरी करत असलेल्या काश्मिरी पंडितांनी आपल्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. काश्मीरमधून पलायन करून जम्मूमध्ये आलेल्या या काश्मिरी पंडितांनी आता पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून सरकारला सुरक्षित ठिकाणी सामावून घेण्याची मागणी केली आहे.

काश्मीरमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टार्गेट किलिंगमुळे सर्व काश्मिरी पंडित कर्मचारी पलायन करून जम्मूमध्ये पोहोचले होते. तेव्हापासून ते त्यांच्या संरक्षणाची निश्चिती करण्याची मागणी करत सातत्याने आंदोलन करत आहेत.

हे सर्व कर्मचारी काश्मीरमध्ये पीएम पॅकेजअंतर्गत नोकरी करत आहेत. मात्र सातत्याने होणाऱ्या टार्गेट किलिंगमुळे त्यांनी काश्मीरमधून पलायन करणेच योग्य समजले. आता ते आपली नोकरी आणि जीविताच्या रक्षणासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी समावून घेण्याची मागणी करत आहेत.

काश्मिरी पंडितांनी सांगितले की, आम्हाला काश्मीरमध्ये जोपर्यंत सुरक्षित वातावरण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही पुन्हा काश्मिरमध्ये परत जाणार नाही. तुम्ही आमच्याकडून सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करून घेता. मात्र ज्या प्रकारे एकवेळ ऑनलाइन काम करून घेतले जात होते. त्याच प्रकारे आम्ही आताही काम करण्यास तयार आहोत. आम्हाला जोपर्यंत सुरक्षित ठिकाणी सामावले जात नाही. तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही असा पवित्रा या काश्मिरी पंडितांनी घेतला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार