शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

ईशान्य भारतात 'नेडा'चा प्रयोग यशस्वी होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 08:42 IST

हिंदीभाषक पट्ट्यासह महाराष्ट्र, गुजरात अशा राज्यांमध्ये भाजपाला सत्ता स्थापन करता आली आहे. तसेच दक्षिणेत स्वबळावर कर्नाटकातही भाजपाला एकदा संधी मिळाली आहे.

मुंबई - हिंदीभाषक पट्ट्यासह महाराष्ट्र, गुजरात अशा राज्यांमध्ये भाजपाला सत्ता स्थापन करता आली आहे. तसेच दक्षिणेत स्वबळावर कर्नाटकातही भाजपाला एकदा संधी मिळाली आहे. मात्र ईशान्य भारतामध्ये आजवर म्हणावे तसे यश कधीही मिळाले नव्हते. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ओडिशा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात भाजपाची पाळेमुळे रोवण्यासाठी प्रयत्न करू असे स्पष्ट वक्तव्य केले आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्नही दिसून येतात.

केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता आल्यानंतर नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सप्रमाणे नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स २४ मे २०१६ रोजी स्थापन करण्यात आली. या आघाडीमध्ये नागा पिपल्स फ्रंट, सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट, पीपल्स पार्टी ऑफ अरुणचल, आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स पार्टी या भाजपाचे सहकारी पक्ष आहेत. आसाममध्ये एकेकाळी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असणारे हेमंत बिस्वा शर्मा भाजपामध्ये आल्यानंतर त्यांच्यामदतीने भाजपा आसाममध्ये सत्तेत येण्यास यशस्वी झाला. त्यांच्याकडेच या आघाडीच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. आसामच्या निवडणुकीनंतर ईशान्य भारतामध्ये भाजपाच्या बाजूने जनमत तयार व्हावे यासाठी राम माधव आणि केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्ननथानम हे या प्रदेशात अक्षरशः तळ ठोकून राहिले. या सर्व प्रयत्नांना यश आले तर भाजपासाठी हा आनंदाचा सर्वात मोठा क्षक्ष असेल. 

सध्या या आघाडीचे सिक्किममध्ये पवनकुमार चामलिंग, आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल, अरुणाचल प्रदेशात पेमा खांडू, मणिपूरमध्ये बिरेन सिंग, नागालँडमध्ये टी.आर. झेलियांग हे मुख्यमंत्री आहेत. अरुणाचल प्रदेशात २००३ साली गेगांग अपांग यांनी भाजपाचे अल्पकाळाचे सरकार स्थापन केले होते. आता नागालँडमध्ये पुन्हा भाजपा आणि नागा पिपल्स पार्टी सत्तेत येण्याची शक्यता आहे. तसेच एक्झीट पोलमध्ये मेघालय आणि त्रिपुरा येथे भाजपाची आघाडी सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्रिपुरामध्ये या एक्झिटपोलनुसार निकाल लागले तर मात्र डाव्यांसाठी तो मोठा धक्का असेल. माणिक सरकार यांचा पराभव करण्यासाठी भाजपाने अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. 

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह