शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Reliance AGM 2019: जम्मू-काश्मीर, लडाखबद्दल मुकेश अंबानींचे मोठे संकेत; मोदींसाठी बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 13:56 IST

मोदींच्या निर्णयाचं मुकेश अंबानींकडून स्वागत

मुंबई: रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये जिओ, तेल क्षेत्रासोबतच अनेक घोषणांचा समावेश होता. मोदी सरकारनं केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिलेल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दलही अंबानींनी मोठे संकेत दिले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च रिलायन्सकडून केला जाणार असल्याचं अंबानी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दलचा दृष्टीकोन पाहता आमच्या कंपनीनं त्या भागात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. यासाठी एका विशेष टीमची स्थापना करण्यात आली असून याबद्दलची योजना लवकरच जाहीर करण्यात येईल, असं अंबानी यांनी सांगितलं. 'पुलवामातील हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्या जवानांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च रिलायन्स करेल,' असं ते म्हणाले. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रिलायन्सच्या वार्षिक सभेत बोलताना अंबानी यांनी मोदी सरकारसाठी जोरदार बॅटिंग केली. गेल्याच आठवड्यात मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्याचीदेखील घोषणा केली. याबद्दल अंबानींनी मोदी सरकारचं कौतुक केलं. मोदींनी 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. याबद्दलचा उल्लेखदेखील त्यांनी वारंवार केला आहे. 5 ट्रिलियनचं ध्येय गाठणं शक्य असून त्यात रिलायन्स मोठी भूमिका बजावेल, असं अंबानी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ तात्पुरत्या स्वरुपाची असून देश लवकरच घोडदौड करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीJammu Kashmirजम्मू-काश्मीरRelianceरिलायन्सladakhलडाखNarendra Modiनरेंद्र मोदीJioजिओReliance Jioरिलायन्स जिओReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशन