शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Reliance AGM 2019: जम्मू-काश्मीर, लडाखबद्दल मुकेश अंबानींचे मोठे संकेत; मोदींसाठी बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 13:56 IST

मोदींच्या निर्णयाचं मुकेश अंबानींकडून स्वागत

मुंबई: रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये जिओ, तेल क्षेत्रासोबतच अनेक घोषणांचा समावेश होता. मोदी सरकारनं केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिलेल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दलही अंबानींनी मोठे संकेत दिले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च रिलायन्सकडून केला जाणार असल्याचं अंबानी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दलचा दृष्टीकोन पाहता आमच्या कंपनीनं त्या भागात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. यासाठी एका विशेष टीमची स्थापना करण्यात आली असून याबद्दलची योजना लवकरच जाहीर करण्यात येईल, असं अंबानी यांनी सांगितलं. 'पुलवामातील हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्या जवानांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च रिलायन्स करेल,' असं ते म्हणाले. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रिलायन्सच्या वार्षिक सभेत बोलताना अंबानी यांनी मोदी सरकारसाठी जोरदार बॅटिंग केली. गेल्याच आठवड्यात मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्याचीदेखील घोषणा केली. याबद्दल अंबानींनी मोदी सरकारचं कौतुक केलं. मोदींनी 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. याबद्दलचा उल्लेखदेखील त्यांनी वारंवार केला आहे. 5 ट्रिलियनचं ध्येय गाठणं शक्य असून त्यात रिलायन्स मोठी भूमिका बजावेल, असं अंबानी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ तात्पुरत्या स्वरुपाची असून देश लवकरच घोडदौड करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीJammu Kashmirजम्मू-काश्मीरRelianceरिलायन्सladakhलडाखNarendra Modiनरेंद्र मोदीJioजिओReliance Jioरिलायन्स जिओReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशन