शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

Reliance AGM 2019: जम्मू-काश्मीर, लडाखबद्दल मुकेश अंबानींचे मोठे संकेत; मोदींसाठी बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 13:56 IST

मोदींच्या निर्णयाचं मुकेश अंबानींकडून स्वागत

मुंबई: रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये जिओ, तेल क्षेत्रासोबतच अनेक घोषणांचा समावेश होता. मोदी सरकारनं केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिलेल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दलही अंबानींनी मोठे संकेत दिले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च रिलायन्सकडून केला जाणार असल्याचं अंबानी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दलचा दृष्टीकोन पाहता आमच्या कंपनीनं त्या भागात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. यासाठी एका विशेष टीमची स्थापना करण्यात आली असून याबद्दलची योजना लवकरच जाहीर करण्यात येईल, असं अंबानी यांनी सांगितलं. 'पुलवामातील हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्या जवानांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च रिलायन्स करेल,' असं ते म्हणाले. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रिलायन्सच्या वार्षिक सभेत बोलताना अंबानी यांनी मोदी सरकारसाठी जोरदार बॅटिंग केली. गेल्याच आठवड्यात मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्याचीदेखील घोषणा केली. याबद्दल अंबानींनी मोदी सरकारचं कौतुक केलं. मोदींनी 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. याबद्दलचा उल्लेखदेखील त्यांनी वारंवार केला आहे. 5 ट्रिलियनचं ध्येय गाठणं शक्य असून त्यात रिलायन्स मोठी भूमिका बजावेल, असं अंबानी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ तात्पुरत्या स्वरुपाची असून देश लवकरच घोडदौड करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीJammu Kashmirजम्मू-काश्मीरRelianceरिलायन्सladakhलडाखNarendra Modiनरेंद्र मोदीJioजिओReliance Jioरिलायन्स जिओReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशन