शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पत्नीला काही लोकांनी फूस लावून पळवले, पोलिसांनी तक्रार घेण्यास दिला नकार, अखेर व्यापाऱ्याचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 10:37 IST

Crime News: उत्तर प्रदेशमधील बदायूं येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या पत्नीला काही लोकांनी फूस लावून पळवले होते. त्यानंतर सदर व्यापारी जेव्हा पोलिसांकडे तक्रार घेऊन गेला, तेव्हा पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. दरम्यान, त्रस्त झालेला व्यापारी कोमामध्ये गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील बदायूंमध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या पत्नीला काही लोक फूस लावून पळवून घेऊन गेले होते. त्यानंतर सदर व्यापारी या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार घेऊन गेला. मात्र पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. दरम्यान आरोपी सदर व्यापाऱ्याला वारंवार धमकावत होते. अखेर त्रस्त होऊन हा व्यापारी कोमामध्ये गेला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमधील बदायूं येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या पत्नीला काही लोकांनी फूस लावून पळवले होते. त्यानंतर सदर व्यापारी जेव्हा पोलिसांकडे तक्रार घेऊन गेला, तेव्हा पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. दरम्यान, त्रस्त झालेला व्यापारी कोमामध्ये गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यातील उसावां गावातील एखा व्यापाऱ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या व्यापाऱ्याचा मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. नातेवाईकांनी व्यापाऱ्याचा मृत्यूनंतर खूप गोंधळ घातला. तसेच मृतदेहाचे शवविच्छेदनही करू दिले नाही. अखेर पोलिसांनी आरोपींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीय शांत झाले.

या व्यापाऱ्याच्या पत्नीला तीन महिन्यांपूर्वी त्याच परिसरातील काही लोकांनी फूस लावून पळवून नेले. आरोपी या व्यापाऱ्याला धमकावत होते. तसेच त्याला मारहाणही करायचे. हा व्यापारी कुटुंबीयांसह अनेकदा पोलीस ठाण्यात गेला. मात्र काहीच कारवाई झाली नाही. दरम्यान पोलिसांनी १५ हजार रुपये लाच घेतली. मात्र तरीही तिच्या वडिलांची तक्रार नोंदवली गेली नाही, असा आरोप मृत व्यापाऱ्याच्या कन्येने केला. या सर्वामुळे व्यापारी मानसिक दृष्ट्या त्रस्त झाला होता. त्यानंतर तो कोमामध्ये गेला. तसेच उपचारांदरम्यान दिल्लीमध्येच त्याचा मृत्यू झाला. आता कुटुंबीयांनी या घटनेसाठी ठाण्यातील एसओ आणि पोलिस कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारUttar Pradeshउत्तर प्रदेश