शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

पत्नीला लागली हॉटेलमधील जेवणाची चटक, दररोज करून लागली ऑर्डर, पतीने विरोध केल्यावर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:51 IST

Relationship News: ऑनलाईन जेवण मागवण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नीला हॉटेलमधून ऑनलाईन जेवण मागवण्याची सवय लागली होती. तर दररोज बाहेरून जेवण मागवण्यास पती विरोध करत होता. पतीने ऑनलाईन जेवण मागवण्यास दिलेल्या नकारामुळे या दोघांमधील वाद एवढा वाढला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.

बदलत्या काळासोबत पती-पत्नीमधील संबंधांमध्येही खूप बदल झाले आहेत. तसेच बऱ्याच पती-पत्नीमध्ये अगदी किरकोळ कारणांवरून तणाव निर्माण होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून असंच एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे ऑनलाईन जेवण मागवण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नीला हॉटेलमधून ऑनलाईन जेवण मागवण्याची सवय लागली होती. तर दररोज बाहेरून जेवण मागवण्यास पती विरोध करत होता. पतीने ऑनलाईन जेवण मागवण्यास दिलेल्या नकारामुळे या दोघांमधील वाद एवढा वाढला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.

ऑनलाईन जेवण मागवण्यावरून झालेल्या वादातून पती-पत्नीमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. त्यामुळे नाराज झालेली पत्नी माहेरी निघून गेली. एवढंच नाही तर तिने पतीविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दिली. त्यानंतर पोलिसांनी ही तक्रार कुटुंब समुपदेशन केंद्राकडे हस्तांतरि केली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आग्रा येथे रहणाऱ्या या पती-पत्नीचा विवाह गतवर्षी म्हणजेच २०२४ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही काळ दोघांमधील नातं सुरळीत सुरू होतं. त्यादरम्यान, एकेदिवशी पतीने हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर दिली. एकदा बाहेरील खाल्ल्यानंतर पत्नीला या जेवणाची चटक लागली. ती दररोज बाहेरून जेवण मागवण्याचा हट्ट पतीकडे करू लागली.

सुरुवातीला दररोज बाहेरून मागवलेलं जेवण खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं, त्यामुळे घरात जेवण बनवत जा असं पतीने पत्नीला समजावून सांगितलं. मात्र पतीच्या या सल्ल्यामुळे ही पपत्नी नाराज झाली. त्यानंतर हॉटेलमधून जेवण मागवण्यावरू पती-पत्नीमध्ये दररोज भांडण होऊ लागलं. एकेदिवशी हा वाद एवढा वाढला की, दोघांमध्ये मारहाणही झाली. त्यानंतर पत्नी रागाने माहेरी निघून गेली. तेव्हापासून मागचे दोन महिने ती माहेरीच आहे. तसेच तिने पतीविरोधात पोलिसांकडे तक्रारही दिली.

दरम्यान, या प्रकरणाचा अंदाज घेतल्यानंतर पोलिसांनी ही तक्रार कुटुंब समुपदेशन केंद्राकडे वर्ग केली. तिथे पती आणि पत्नीचं समुपदेशन करण्यात आलं. पती-पत्नीची समजूत घालण्यात आल्याचं समुपदेशकांनी सांगितलं आहे. रोज बाहेरून जेवण न मागवता घरात जेवण बनवत जा असा सल्ला पत्नीला देण्यात आला. तर कधी कधी हॉटेलमधून जेवण मागवत जा, असा सल्ला पतीला देण्यात आला आहे.  त्यानंतर या सल्ल्यावर दोघांनाही राजी करून त्यांच्यात समुपदेशकांनी सध्यातरी समेट घडवून आणला आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपFamilyपरिवारfoodअन्नUttar Pradeshउत्तर प्रदेश