शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

इतिहासाची मढी उकरण्यासाठी वर्तमान का खर्ची घालायचा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 8:33 AM

इतिहासातील उणीदुणी काढण्याऐवजी वर्तमानात अनेक उणिवा आहेत, त्यांची धुणी धुतली जाणे अधिक महत्त्वाचे आहे. 

बाळकृष्ण शिंदे, पुणे

‘तुमच्या चुकांसाठी नेहरूंना जबाबदार कसे धरता?  केवळ बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नाहीत’, अशा शेलक्या शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी  घाणाघात केला, हे उत्तमच झाले. आजकाल नैमित्तिक कारणे शोधून नेहरूंना दोषी ठरवण्याची जणू ‘फॅशन’च झाली आहे. भारताला औद्योगिक आणि वैज्ञानिक मार्गाने नेणारे नेहरू व्हॉटस्ॲपच्या आजच्या युगात वेगळे भासवले जातात, त्यांचे हेतुपूर्वक  प्रतिमा भंजन केले जाते, ते टीकाविषय होतात. नेहरूंच्याच ‘अमन- शांती’मय मखमली हाताखाली सरदारांनी देशात पोलादी कार्य करून दाखवले होते. सर्व जगाचा विरोध डावलून नेहरूंनी भाभा अणू संशोधन केंद्राची स्थापना केली. म्हणूनच आज आपण अणुशस्त्र सज्ज होऊ शकलो आहोत. आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांची पायाभरणी केली आणि यातूनच आपण आज संगणक क्षेत्रात पुढे जाऊ शकलो आहोत. याहूनही महत्त्वाचे म्हणजे नेहरूंनीच लोकशाहीसाठी आवश्यक अशा संस्था उभ्या केल्या,  संवैधानिक दर्जा देत त्या टिकवल्या.  

सध्या देशात नेहरूद्वेषाचे वातावरण जाणीवपूर्वक तापवून त्यांची बदनामी करण्याची एक प्रथाच पडत चालली आहे. नेहरू गेल्यानंतरही ५८ वर्षांहून अधिक वर्षे लोटली तरी विरोधकांना त्यांची बदनामी करण्याची गरज भासते, यावरूनच नेहरूंची महानता दिसून येते. नेहरूंनी निर्माण केलेल्या लोकशाही संस्था आज हेतुपुरस्सर उद्ध्वस्त  केल्या जात आहेत. जसे की : सुधारणांचा पटल एकजिनसी राहावा आणि राज्यांच्या योजनांना काही निकष लावून आणि अभ्यासांती ती राबवली जावीत, या हेतूने जवाहरलाल  नेहरूंनी नियोजन आयोगाची बांधणी केली; पण २०१४ पासून नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली.

नेहरूंनी स्थापन केलेल्या नवरत्न कंपन्या; ज्यांचे वर्णन नेहरूंनी आधुनिक भारतातील मंदिरे, असे केले होते, त्या सरकारने विक्रीस काढल्या आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देशात इतका जनाधार होता की, ते सहज हुकूमशहा बनू शकले असते. कारण नेहरू पंतप्रधानपदी असल्याच्या आपल्या संपूर्ण १६-१७ वर्षांच्या कार्यकाळात संसदेतील विरोधी पक्षांचे संख्याबळ कायम एकतृतीयांशापेक्षा कमी राहिले. तरीही केवळ संसदेतील सत्ताधारी पक्षाचे बहुमत म्हणजे लोकशाही नव्हे, हे त्यांनी आपल्या  उक्ती आणि कृतींतूनही सतत दाखवून दिले. 

स्वतःचे कर्तृत्व नसेल, तर  इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. सांप्रत  ‘इतिहासजीवी’ लोकांना इतकेच सांगावेसे वाटते की, इतिहासातील जखमा या कोणत्याही उपायांनी वर्तमानात भरून येऊ शकत नाहीत, याची जाणीव नसेल, तसेच इतिहासातील मढी उकरण्यासाठी वर्तमान किती खर्ची घालणार, याचे तारतम्य नसेल, तर भविष्य घडणे तर दूरच; पण ते करपण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळे इतिहासातील उणीदुणी काढण्याऐवजी वर्तमानात अनेक उणिवा आहेत, त्यांची  धुणी धुतली जाणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूManmohan Singhमनमोहन सिंग