शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाची मढी उकरण्यासाठी वर्तमान का खर्ची घालायचा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 08:34 IST

इतिहासातील उणीदुणी काढण्याऐवजी वर्तमानात अनेक उणिवा आहेत, त्यांची धुणी धुतली जाणे अधिक महत्त्वाचे आहे. 

बाळकृष्ण शिंदे, पुणे

‘तुमच्या चुकांसाठी नेहरूंना जबाबदार कसे धरता?  केवळ बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नाहीत’, अशा शेलक्या शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी  घाणाघात केला, हे उत्तमच झाले. आजकाल नैमित्तिक कारणे शोधून नेहरूंना दोषी ठरवण्याची जणू ‘फॅशन’च झाली आहे. भारताला औद्योगिक आणि वैज्ञानिक मार्गाने नेणारे नेहरू व्हॉटस्ॲपच्या आजच्या युगात वेगळे भासवले जातात, त्यांचे हेतुपूर्वक  प्रतिमा भंजन केले जाते, ते टीकाविषय होतात. नेहरूंच्याच ‘अमन- शांती’मय मखमली हाताखाली सरदारांनी देशात पोलादी कार्य करून दाखवले होते. सर्व जगाचा विरोध डावलून नेहरूंनी भाभा अणू संशोधन केंद्राची स्थापना केली. म्हणूनच आज आपण अणुशस्त्र सज्ज होऊ शकलो आहोत. आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांची पायाभरणी केली आणि यातूनच आपण आज संगणक क्षेत्रात पुढे जाऊ शकलो आहोत. याहूनही महत्त्वाचे म्हणजे नेहरूंनीच लोकशाहीसाठी आवश्यक अशा संस्था उभ्या केल्या,  संवैधानिक दर्जा देत त्या टिकवल्या.  

सध्या देशात नेहरूद्वेषाचे वातावरण जाणीवपूर्वक तापवून त्यांची बदनामी करण्याची एक प्रथाच पडत चालली आहे. नेहरू गेल्यानंतरही ५८ वर्षांहून अधिक वर्षे लोटली तरी विरोधकांना त्यांची बदनामी करण्याची गरज भासते, यावरूनच नेहरूंची महानता दिसून येते. नेहरूंनी निर्माण केलेल्या लोकशाही संस्था आज हेतुपुरस्सर उद्ध्वस्त  केल्या जात आहेत. जसे की : सुधारणांचा पटल एकजिनसी राहावा आणि राज्यांच्या योजनांना काही निकष लावून आणि अभ्यासांती ती राबवली जावीत, या हेतूने जवाहरलाल  नेहरूंनी नियोजन आयोगाची बांधणी केली; पण २०१४ पासून नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली.

नेहरूंनी स्थापन केलेल्या नवरत्न कंपन्या; ज्यांचे वर्णन नेहरूंनी आधुनिक भारतातील मंदिरे, असे केले होते, त्या सरकारने विक्रीस काढल्या आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देशात इतका जनाधार होता की, ते सहज हुकूमशहा बनू शकले असते. कारण नेहरू पंतप्रधानपदी असल्याच्या आपल्या संपूर्ण १६-१७ वर्षांच्या कार्यकाळात संसदेतील विरोधी पक्षांचे संख्याबळ कायम एकतृतीयांशापेक्षा कमी राहिले. तरीही केवळ संसदेतील सत्ताधारी पक्षाचे बहुमत म्हणजे लोकशाही नव्हे, हे त्यांनी आपल्या  उक्ती आणि कृतींतूनही सतत दाखवून दिले. 

स्वतःचे कर्तृत्व नसेल, तर  इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. सांप्रत  ‘इतिहासजीवी’ लोकांना इतकेच सांगावेसे वाटते की, इतिहासातील जखमा या कोणत्याही उपायांनी वर्तमानात भरून येऊ शकत नाहीत, याची जाणीव नसेल, तसेच इतिहासातील मढी उकरण्यासाठी वर्तमान किती खर्ची घालणार, याचे तारतम्य नसेल, तर भविष्य घडणे तर दूरच; पण ते करपण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळे इतिहासातील उणीदुणी काढण्याऐवजी वर्तमानात अनेक उणिवा आहेत, त्यांची  धुणी धुतली जाणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूManmohan Singhमनमोहन सिंग