शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

इतिहासाची मढी उकरण्यासाठी वर्तमान का खर्ची घालायचा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 08:34 IST

इतिहासातील उणीदुणी काढण्याऐवजी वर्तमानात अनेक उणिवा आहेत, त्यांची धुणी धुतली जाणे अधिक महत्त्वाचे आहे. 

बाळकृष्ण शिंदे, पुणे

‘तुमच्या चुकांसाठी नेहरूंना जबाबदार कसे धरता?  केवळ बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नाहीत’, अशा शेलक्या शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी  घाणाघात केला, हे उत्तमच झाले. आजकाल नैमित्तिक कारणे शोधून नेहरूंना दोषी ठरवण्याची जणू ‘फॅशन’च झाली आहे. भारताला औद्योगिक आणि वैज्ञानिक मार्गाने नेणारे नेहरू व्हॉटस्ॲपच्या आजच्या युगात वेगळे भासवले जातात, त्यांचे हेतुपूर्वक  प्रतिमा भंजन केले जाते, ते टीकाविषय होतात. नेहरूंच्याच ‘अमन- शांती’मय मखमली हाताखाली सरदारांनी देशात पोलादी कार्य करून दाखवले होते. सर्व जगाचा विरोध डावलून नेहरूंनी भाभा अणू संशोधन केंद्राची स्थापना केली. म्हणूनच आज आपण अणुशस्त्र सज्ज होऊ शकलो आहोत. आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांची पायाभरणी केली आणि यातूनच आपण आज संगणक क्षेत्रात पुढे जाऊ शकलो आहोत. याहूनही महत्त्वाचे म्हणजे नेहरूंनीच लोकशाहीसाठी आवश्यक अशा संस्था उभ्या केल्या,  संवैधानिक दर्जा देत त्या टिकवल्या.  

सध्या देशात नेहरूद्वेषाचे वातावरण जाणीवपूर्वक तापवून त्यांची बदनामी करण्याची एक प्रथाच पडत चालली आहे. नेहरू गेल्यानंतरही ५८ वर्षांहून अधिक वर्षे लोटली तरी विरोधकांना त्यांची बदनामी करण्याची गरज भासते, यावरूनच नेहरूंची महानता दिसून येते. नेहरूंनी निर्माण केलेल्या लोकशाही संस्था आज हेतुपुरस्सर उद्ध्वस्त  केल्या जात आहेत. जसे की : सुधारणांचा पटल एकजिनसी राहावा आणि राज्यांच्या योजनांना काही निकष लावून आणि अभ्यासांती ती राबवली जावीत, या हेतूने जवाहरलाल  नेहरूंनी नियोजन आयोगाची बांधणी केली; पण २०१४ पासून नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली.

नेहरूंनी स्थापन केलेल्या नवरत्न कंपन्या; ज्यांचे वर्णन नेहरूंनी आधुनिक भारतातील मंदिरे, असे केले होते, त्या सरकारने विक्रीस काढल्या आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देशात इतका जनाधार होता की, ते सहज हुकूमशहा बनू शकले असते. कारण नेहरू पंतप्रधानपदी असल्याच्या आपल्या संपूर्ण १६-१७ वर्षांच्या कार्यकाळात संसदेतील विरोधी पक्षांचे संख्याबळ कायम एकतृतीयांशापेक्षा कमी राहिले. तरीही केवळ संसदेतील सत्ताधारी पक्षाचे बहुमत म्हणजे लोकशाही नव्हे, हे त्यांनी आपल्या  उक्ती आणि कृतींतूनही सतत दाखवून दिले. 

स्वतःचे कर्तृत्व नसेल, तर  इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. सांप्रत  ‘इतिहासजीवी’ लोकांना इतकेच सांगावेसे वाटते की, इतिहासातील जखमा या कोणत्याही उपायांनी वर्तमानात भरून येऊ शकत नाहीत, याची जाणीव नसेल, तसेच इतिहासातील मढी उकरण्यासाठी वर्तमान किती खर्ची घालणार, याचे तारतम्य नसेल, तर भविष्य घडणे तर दूरच; पण ते करपण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळे इतिहासातील उणीदुणी काढण्याऐवजी वर्तमानात अनेक उणिवा आहेत, त्यांची  धुणी धुतली जाणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूManmohan Singhमनमोहन सिंग