शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

इतिहासाची मढी उकरण्यासाठी वर्तमान का खर्ची घालायचा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 08:34 IST

इतिहासातील उणीदुणी काढण्याऐवजी वर्तमानात अनेक उणिवा आहेत, त्यांची धुणी धुतली जाणे अधिक महत्त्वाचे आहे. 

बाळकृष्ण शिंदे, पुणे

‘तुमच्या चुकांसाठी नेहरूंना जबाबदार कसे धरता?  केवळ बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नाहीत’, अशा शेलक्या शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी  घाणाघात केला, हे उत्तमच झाले. आजकाल नैमित्तिक कारणे शोधून नेहरूंना दोषी ठरवण्याची जणू ‘फॅशन’च झाली आहे. भारताला औद्योगिक आणि वैज्ञानिक मार्गाने नेणारे नेहरू व्हॉटस्ॲपच्या आजच्या युगात वेगळे भासवले जातात, त्यांचे हेतुपूर्वक  प्रतिमा भंजन केले जाते, ते टीकाविषय होतात. नेहरूंच्याच ‘अमन- शांती’मय मखमली हाताखाली सरदारांनी देशात पोलादी कार्य करून दाखवले होते. सर्व जगाचा विरोध डावलून नेहरूंनी भाभा अणू संशोधन केंद्राची स्थापना केली. म्हणूनच आज आपण अणुशस्त्र सज्ज होऊ शकलो आहोत. आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांची पायाभरणी केली आणि यातूनच आपण आज संगणक क्षेत्रात पुढे जाऊ शकलो आहोत. याहूनही महत्त्वाचे म्हणजे नेहरूंनीच लोकशाहीसाठी आवश्यक अशा संस्था उभ्या केल्या,  संवैधानिक दर्जा देत त्या टिकवल्या.  

सध्या देशात नेहरूद्वेषाचे वातावरण जाणीवपूर्वक तापवून त्यांची बदनामी करण्याची एक प्रथाच पडत चालली आहे. नेहरू गेल्यानंतरही ५८ वर्षांहून अधिक वर्षे लोटली तरी विरोधकांना त्यांची बदनामी करण्याची गरज भासते, यावरूनच नेहरूंची महानता दिसून येते. नेहरूंनी निर्माण केलेल्या लोकशाही संस्था आज हेतुपुरस्सर उद्ध्वस्त  केल्या जात आहेत. जसे की : सुधारणांचा पटल एकजिनसी राहावा आणि राज्यांच्या योजनांना काही निकष लावून आणि अभ्यासांती ती राबवली जावीत, या हेतूने जवाहरलाल  नेहरूंनी नियोजन आयोगाची बांधणी केली; पण २०१४ पासून नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली.

नेहरूंनी स्थापन केलेल्या नवरत्न कंपन्या; ज्यांचे वर्णन नेहरूंनी आधुनिक भारतातील मंदिरे, असे केले होते, त्या सरकारने विक्रीस काढल्या आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देशात इतका जनाधार होता की, ते सहज हुकूमशहा बनू शकले असते. कारण नेहरू पंतप्रधानपदी असल्याच्या आपल्या संपूर्ण १६-१७ वर्षांच्या कार्यकाळात संसदेतील विरोधी पक्षांचे संख्याबळ कायम एकतृतीयांशापेक्षा कमी राहिले. तरीही केवळ संसदेतील सत्ताधारी पक्षाचे बहुमत म्हणजे लोकशाही नव्हे, हे त्यांनी आपल्या  उक्ती आणि कृतींतूनही सतत दाखवून दिले. 

स्वतःचे कर्तृत्व नसेल, तर  इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. सांप्रत  ‘इतिहासजीवी’ लोकांना इतकेच सांगावेसे वाटते की, इतिहासातील जखमा या कोणत्याही उपायांनी वर्तमानात भरून येऊ शकत नाहीत, याची जाणीव नसेल, तसेच इतिहासातील मढी उकरण्यासाठी वर्तमान किती खर्ची घालणार, याचे तारतम्य नसेल, तर भविष्य घडणे तर दूरच; पण ते करपण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळे इतिहासातील उणीदुणी काढण्याऐवजी वर्तमानात अनेक उणिवा आहेत, त्यांची  धुणी धुतली जाणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूManmohan Singhमनमोहन सिंग