शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

'मग ST कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 13:10 IST

नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे

ठळक मुद्दे  अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवात 12 रुग्ण मयत झाले. मग, ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?.

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचं संसदेतील भाषण चर्चेचा विषय बनलं आहे. कोरोना विषयावरील चर्चासत्रात खासदार कोल्हेंनी तुफान फटकेबाजी करताना मोदी सरकारला लक्ष्य केले. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुकही केले. तर, मोदी सरकारवर जबरी टीका केली होती. कोल्हेंच्या या टीकेला आता भाजपा नेते आणि अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलंय. 

खासदार कोल्हेंनी कोरोना कालावधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची जबाबदारी मोदी सरकार घेणार का, असे म्हटले. डॉ. कोल्हेंनी मोदींना उद्देशून कवितेच्या माध्यमातून टोला लगावला. "अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो,पराजय का बोझ भी स्वीकारना होगा"'जर लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्राची जबाबदारी पण घ्यायला हवी', असे कोल्हेंनी म्हटले होते. कोल्हेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, राज्यातील ST कामगारांच्या डेथ सर्टीफिकेटवर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न केला एबीपी माझाशी बोलताना आहे.    अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवात 12 रुग्ण मयत झाले. मग, ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?. नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे. तसेच, राजकारण करणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर द्यायला कमी पडणार नाही. सरकारच्या काळातील आत्महत्येनुसार फोटो छापायला लागले तर सर्वात जास्त डेथ सर्टिफिकेटवर महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लागतील, दुसरे कोणाचेही नाही, असे म्हणत सुजय विखे यांनी अमोल कोल्हेंच्या टीकेवरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. 

तिन्ही नेत्यांना भारतरत्न द्यावा

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमदील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना प्रत्येकी एक-एक भारतरत्न द्यायला हवा, एवढं त्यांचं काम कौतुकास्पद आहे. यांनी ग्लोबल टेंडर काढलं होतं, एक तरी लस विकत घेतली का? असा सवाल सुजय विखेंनी विचारला. संसदेत काल बुस्टर डोसची चर्चा झाली, त्यावर स्वत: WHO ने बुस्टर डोसची गरज नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेलाही सुजय विखे यांनी प्रत्युत्तर दिलं.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेUddhav Thackerayउद्धव ठाकरेST Strikeएसटी संपFarmerशेतकरी