शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

'मग ST कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 13:10 IST

नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे

ठळक मुद्दे  अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवात 12 रुग्ण मयत झाले. मग, ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?.

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचं संसदेतील भाषण चर्चेचा विषय बनलं आहे. कोरोना विषयावरील चर्चासत्रात खासदार कोल्हेंनी तुफान फटकेबाजी करताना मोदी सरकारला लक्ष्य केले. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुकही केले. तर, मोदी सरकारवर जबरी टीका केली होती. कोल्हेंच्या या टीकेला आता भाजपा नेते आणि अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलंय. 

खासदार कोल्हेंनी कोरोना कालावधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची जबाबदारी मोदी सरकार घेणार का, असे म्हटले. डॉ. कोल्हेंनी मोदींना उद्देशून कवितेच्या माध्यमातून टोला लगावला. "अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो,पराजय का बोझ भी स्वीकारना होगा"'जर लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्राची जबाबदारी पण घ्यायला हवी', असे कोल्हेंनी म्हटले होते. कोल्हेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, राज्यातील ST कामगारांच्या डेथ सर्टीफिकेटवर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न केला एबीपी माझाशी बोलताना आहे.    अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवात 12 रुग्ण मयत झाले. मग, ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?. नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे. तसेच, राजकारण करणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर द्यायला कमी पडणार नाही. सरकारच्या काळातील आत्महत्येनुसार फोटो छापायला लागले तर सर्वात जास्त डेथ सर्टिफिकेटवर महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लागतील, दुसरे कोणाचेही नाही, असे म्हणत सुजय विखे यांनी अमोल कोल्हेंच्या टीकेवरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. 

तिन्ही नेत्यांना भारतरत्न द्यावा

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमदील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना प्रत्येकी एक-एक भारतरत्न द्यायला हवा, एवढं त्यांचं काम कौतुकास्पद आहे. यांनी ग्लोबल टेंडर काढलं होतं, एक तरी लस विकत घेतली का? असा सवाल सुजय विखेंनी विचारला. संसदेत काल बुस्टर डोसची चर्चा झाली, त्यावर स्वत: WHO ने बुस्टर डोसची गरज नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेलाही सुजय विखे यांनी प्रत्युत्तर दिलं.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेUddhav Thackerayउद्धव ठाकरेST Strikeएसटी संपFarmerशेतकरी