शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

एकाच्या बदल्यात दहा शीर आणणारे गप्प का? ज्योतिरादित्य शिंदे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 17:33 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन विरोधी पक्षाने मंगळवारी संसदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या सभागृहात काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित करत याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून असल्याचा आरोप केला.

ठळक मुद्दे विरोधी पक्षाने मंगळवारी संसदेत सरकारला घेरण्याचा केला प्रयत्न एकाच्या बदल्यात दहा शीर घेवून येऊ, असे सांगणारे आता गप्प का?पाकिस्तानसह विदेशी धोरण स्पष्ट करण्याची मागणी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन विरोधी पक्षाने मंगळवारी संसदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या सभागृहात काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित करत याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून असल्याचा आरोप केला. तसेच, पाकिस्तानसह विदेशी धोरण स्पष्ट करण्याची मागणी केली. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे  यांनी सरकारवर हल्लाबोल करत एकाच्या बदल्यात दहा शीर घेऊन येऊ, असे सांगणारे आता गप्प का आहेत असा सवाल केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेतील शून्यकाळ हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, 2017 च्या शेवटच्या दिवसात संपूर्ण देश नवीन वर्षाच्या स्वागतात दंग होता. मात्र, यावेळी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटरवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. आपले जवान देशाच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे. मात्र, चिंता याबाबतची आहे की सरकार जवानांच्या सुरक्षतेकडे गंभीरपणे पाहत नाही. याआधीही पंपोर, पठाणकोटसह अनेक भागात दहशतवादी हल्ले झाले आहेत. यावर अनेक समित्या तयार करण्यात आल्या. मात्र याप्रकरणी कोणतीही कारवाई अद्याप झाली नाही, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, पुलवामा हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना आधीपासूनच होती. दहशतवादी ज्याठिकाणाहून घुसले, त्याठिकाणी प्रकाश नव्हता. तसेच, एकाच्या बदल्यात दहा शीर घेवून आणू असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता यावर गप्प का बसले आहेत, असा सवाल यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. 

 

 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभा