शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:15 IST2025-09-25T11:13:20+5:302025-09-25T11:15:23+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, 'जागतिक अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नसल्याने ग्रामीण आणि आदिवासी भारतात आपण गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्यांना तोंड देत आहोत.'

Why are farmers not getting fair price for their crops? Nitin Gadkari explained the reason | शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले

शेतकऱ्यांच्या मालाला मिळणाऱ्या भावावरून अनेक वेळा चर्चा होतात. पण, परिस्थिती मात्र बदलत नाही. दरम्यान, यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. 'ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य किंमत मिळत नाही त्यांना सरकारने पाठिंबा द्यावा कारण किंमत ही जागतिक घटकांवर अवलंबून असते',असंही गडकरी म्हणाले.'भारतातील ६५ टक्के लोक शेतीमध्ये गुंतलेले आहेत पण देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) त्यांचे योगदान फक्त १४ टक्के आहे', असंही गडकरी म्हणाले.

काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान

'इंडिया बायो-एनर्जी अँड टेक्नॉलॉजी एक्स्पो'मध्ये बोलताना गडकरी म्हणाले, साखरेच्या किमती ब्राझील, तेल मलेशिया, मका अमेरिका आणि सोयाबीन अर्जेंटिना यांच्या किमतींवर परिणाम करतात. 'जागतिक अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नसल्याने ग्रामीण आणि आदिवासी भारतात आपण गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्यांना तोंड देत आहोत'

शेतीला पाठिंबा देण्याची गरज

नितीन गडकरी म्हणाले, "अशा परिस्थितीत, आपली ग्रामीण शेती आणि आदिवासी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी, आपल्याला शेतीला पाठिंबा देण्याची गरज आहे. जे ग्राहकांसाठी, देशासाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य किंमत न मिळाल्याने अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

गडकरी म्हणाले की, जेव्हा सरकारने मक्यापासून बायो-इथेनॉल उत्पादनास मान्यता दिली तेव्हा मक्याची किंमत प्रति क्विंटल १,२०० रुपयांवरून २,८०० रुपये प्रति क्विंटल झाली. मक्यापासून इथेनॉल उत्पादन करून शेतकऱ्यांनी ४५,००० कोटी रुपये अतिरिक्त कमावले आहेत.

गडकरी म्हणाले, "या दृष्टिकोनातून पाहता, शेतीला ऊर्जा आणि वीज क्षेत्राकडे वळवणे ही आपल्या देशाची गरज आहे. भारतात पर्यायी इंधन आणि जैवइंधनांचे भविष्य उज्ज्वल आहे. सध्या आपण ऊर्जा आयातदार आहोत. तो दिवस येईल जेव्हा आपण ऊर्जा निर्यातदार होऊ. ही देशासाठी सर्वात महत्त्वाची ऐतिहासिक कामगिरी असेल. 

देशातील वायू प्रदूषणाचा संदर्भ देत गडकरी म्हणाले की, ४० टक्के वायू प्रदूषण वाहतूक इंधनांमुळे होते आणि ही देशासाठी, विशेषतः दिल्लीसाठी एक मोठी समस्या आहे. भारत दरवर्षी २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो, यामुळे वायू प्रदूषणही वाढत आहे. आर्थिक आणि प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून, जग आणि भारताने जैवइंधन आणि पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे. शाश्वत विमान इंधनांच्या क्षेत्रात भारताला आघाडीवर बनवणे हे त्यांचे ध्येय आहे, असंही गडकरींनी सांगितले.

Web Title : किसानों को उचित मूल्य क्यों नहीं मिलता, गडकरी ने बताया कारण

Web Summary : गडकरी ने फसल की कीमतों को प्रभावित करने वाले वैश्विक कारकों पर प्रकाश डाला और सरकारी समर्थन की वकालत की। उन्होंने कहा कि 65% भारतीयों को रोजगार देने के बावजूद कृषि का जीडीपी योगदान कम है। उन्होंने किसान आय बढ़ाने, प्रदूषण कम करने और ऊर्जा स्वतंत्रता प्राप्त करने के लिए जैव ईंधन और वैकल्पिक ऊर्जा स्रोतों को बढ़ावा देने पर जोर दिया।

Web Title : Gadkari explains why farmers don't get fair prices for crops.

Web Summary : Gadkari highlighted global factors impacting crop prices, advocating for government support. He noted agriculture's low GDP contribution despite employing 65% of Indians. He emphasized promoting bio-fuels and alternative energy sources to boost farmer income, reduce pollution, and achieve energy independence.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.