शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 09:17 IST

भारताचे लष्करप्र मुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मद्रास येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले.

भारत-पाकिस्तान संघर्ष आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी मात्र त्यांनी आपण जिंकल्याचा आव आणत, जगभरात आपलाच विजय झाल्याचे म्हटले होते. मात्र, काही गोष्टी समोर आल्या आणि पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्याचे सगळ्यांच्या समोर आले. यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा सगळ्यांसामोर उघडा पडला. आता भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी यावर टीका केली आहे. 

जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मद्रास येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची अवस्था कशी झाली होती, ते देखील सांगितले. यावेळी बोलताना जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, 'जर तुम्ही कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला विचारलं की, युद्ध कुणी जिंकलं? तर, ते नक्की हेच म्हणतील की, आम्हीच जिंकलो, म्हणूनच आमचा प्रमुख फील्ड मार्शल झाला.'

या व्यक्तव्यातून जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या फील्ड मार्शलपदी नियुक्तीवरही टीका केली आहे. यासोबतच, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत ते म्हणाले की, "केंद्र सरकारने सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. यामुळेच आपण पाकिस्तानला धडा शिकवण्यात यशस्वी झालो आहोत."

लष्करप्रमुख म्हणाले की,एक नरेटीव्ह मॅनेजमेंटद्वारे पाकिस्तानी सैन्याने जनतेला विश्वासात घेतले आहे. तेथील संघर्षाबद्दल सोशल मीडियावर एक खोटी कथा तयार केली गेली. यामुळेच पाकिस्तानच्या लोकांना अजूनही वाटते की, ते जिंकले आहेत. याद्वारे युद्धादरम्यान एक अशी कथा तयार केली गेली, ज्यात आपण जिंकत आहोत हे दाखवले गेले. 

काहीतरी मोठे करण्याचे आदेश आले!पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते. सर्वांना पाकिस्तानकडून बदला घ्यायचा होता. हल्ल्याच्या २४ तासांच्या आत संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत थेट आणि स्पष्ट आदेश देण्यात आले. आता काहीतरी मोठे करायचे आहे. आता हे पुरे झाले. आम्हाला, लष्कर प्रमुखांना, पाकिस्तानकडून बदला घेण्याची संपूर्ण रणनीती बनवण्याचे काम देण्यात आले होते. या विश्वासामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आहे, असे जनरल द्विवेदी म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला झालेल्या नुकसानाबद्दल पहिल्यांदाच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विधान केले. याआधी हवाई दल प्रमुखांनी काल सांगितले होते की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान आम्ही पाकिस्तानचे ५ लढाऊ विमान पाडले आहेत. ३०० किलोमीटर आत घुसून आम्ही त्यांना धडा शिकवला आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारत