शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 09:17 IST

भारताचे लष्करप्र मुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मद्रास येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले.

भारत-पाकिस्तान संघर्ष आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी मात्र त्यांनी आपण जिंकल्याचा आव आणत, जगभरात आपलाच विजय झाल्याचे म्हटले होते. मात्र, काही गोष्टी समोर आल्या आणि पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्याचे सगळ्यांच्या समोर आले. यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा सगळ्यांसामोर उघडा पडला. आता भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी यावर टीका केली आहे. 

जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मद्रास येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची अवस्था कशी झाली होती, ते देखील सांगितले. यावेळी बोलताना जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, 'जर तुम्ही कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला विचारलं की, युद्ध कुणी जिंकलं? तर, ते नक्की हेच म्हणतील की, आम्हीच जिंकलो, म्हणूनच आमचा प्रमुख फील्ड मार्शल झाला.'

या व्यक्तव्यातून जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या फील्ड मार्शलपदी नियुक्तीवरही टीका केली आहे. यासोबतच, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत ते म्हणाले की, "केंद्र सरकारने सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. यामुळेच आपण पाकिस्तानला धडा शिकवण्यात यशस्वी झालो आहोत."

लष्करप्रमुख म्हणाले की,एक नरेटीव्ह मॅनेजमेंटद्वारे पाकिस्तानी सैन्याने जनतेला विश्वासात घेतले आहे. तेथील संघर्षाबद्दल सोशल मीडियावर एक खोटी कथा तयार केली गेली. यामुळेच पाकिस्तानच्या लोकांना अजूनही वाटते की, ते जिंकले आहेत. याद्वारे युद्धादरम्यान एक अशी कथा तयार केली गेली, ज्यात आपण जिंकत आहोत हे दाखवले गेले. 

काहीतरी मोठे करण्याचे आदेश आले!पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते. सर्वांना पाकिस्तानकडून बदला घ्यायचा होता. हल्ल्याच्या २४ तासांच्या आत संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत थेट आणि स्पष्ट आदेश देण्यात आले. आता काहीतरी मोठे करायचे आहे. आता हे पुरे झाले. आम्हाला, लष्कर प्रमुखांना, पाकिस्तानकडून बदला घेण्याची संपूर्ण रणनीती बनवण्याचे काम देण्यात आले होते. या विश्वासामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आहे, असे जनरल द्विवेदी म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला झालेल्या नुकसानाबद्दल पहिल्यांदाच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विधान केले. याआधी हवाई दल प्रमुखांनी काल सांगितले होते की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान आम्ही पाकिस्तानचे ५ लढाऊ विमान पाडले आहेत. ३०० किलोमीटर आत घुसून आम्ही त्यांना धडा शिकवला आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारत