शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील बंडखोर आमदारांसाठी कोट्यावधीचा खर्च करतंय तरी कोण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 12:20 IST

मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी त्यांना अज्ञात ठिकाणी तसेच अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देप्रत्येक पक्षाने आमदारांवर कमीत कमी आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले आहेतबंडखोर आमदारांना त्यांच्या सोयीप्रमाणे विशेष विमानं कशी मिळत आहेत? काँग्रेसचा सवाल कर्नाटकात याआधीही अनेकदा अशाप्रकारे राजकीय संकटं आली आहेत

बंगळुरु - कर्नाटकात सध्या होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष्य आहे. कर्नाटकात प्रत्येक दिवशी काही ना काही राजकीय नाट्य घडत आहे. या संपूर्ण घडामोडीत कर्नाटकातील जनतेसमोर एक प्रश्न उभा राहिला आहे की, जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा आमदारांवर केला जाणारा खर्च कुठून येत आहे? तिन्ही राजकीय पक्षाच्या आमदारांची उठाठेव आणि अलिशान हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च जवळपास कोट्यावधीच्या घरात आहे. 

मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी त्यांना अज्ञात ठिकाणी तसेच अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. हे आमदार चार्टड प्लेनमधून मुंबई आणि बंगळुरु प्रवास करत आहेत. तसेच सुप्रीम कोर्टात सुरु असणाऱ्या सुनावणीसाठी वकीलांची फौज तयार आहे त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त आमदारांना आपल्या पक्षात ठेवण्यासाठी हा खर्च केला जात आहे. एका आमदारावर जवळपास 20 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. बंगळुरु आणि मुंबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये या आमदारांना ठेवलं गेलं तिथे त्यांच्या राहण्याची सोय ज्या हॉटेलमध्ये केली आहे तेथील दिवसाचा खर्च 4 हजार रुपयांपासून 11 हजार रुपयांपर्यंत आहे. तर बंगळुरु, मुंबईमधील विशेष विमानाचा खर्च 4 लाख रुपये प्रति प्रवास आहे. 

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, आमदारांनासोबत ठेवण्यासाठी प्रत्येक पक्षाने कमीत कमी आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यासोबत या आमदारांना महाराष्ट्रातील शिर्डी मंदिरात जाण्यासाठी विशेष विमान बुक केलं गेलं. तर दुसरीकडे या अफाट खर्चामागे काँग्रेस-जेडीएसने भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. मात्र वास्तविक परिस्थिती पाहता हा सगळा पैसा कोण खर्च करतोय हे कोणालाही माहिती नाही. जर भाजपा हा खर्च करत नसेल तर बंडखोर आमदारांना त्यांच्या सोयीप्रमाणे विशेष विमानं कशी मिळत आहेत? असा सवाल काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. 

कर्नाटकातील ही राजकीय परिस्थिती पहिल्यांदा नाही. याआधी 14 महिन्यांमध्ये 3 वेळा जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षांनी आपल्या आमदारांना आलिशान हॉटेलमध्ये ठेवलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही अशाचप्रकारे आमदारांना एकत्रितपणे मुंबई, गोव्याला पाठविण्यात आलं होतं.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस