शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील बंडखोर आमदारांसाठी कोट्यावधीचा खर्च करतंय तरी कोण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 12:20 IST

मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी त्यांना अज्ञात ठिकाणी तसेच अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देप्रत्येक पक्षाने आमदारांवर कमीत कमी आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले आहेतबंडखोर आमदारांना त्यांच्या सोयीप्रमाणे विशेष विमानं कशी मिळत आहेत? काँग्रेसचा सवाल कर्नाटकात याआधीही अनेकदा अशाप्रकारे राजकीय संकटं आली आहेत

बंगळुरु - कर्नाटकात सध्या होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष्य आहे. कर्नाटकात प्रत्येक दिवशी काही ना काही राजकीय नाट्य घडत आहे. या संपूर्ण घडामोडीत कर्नाटकातील जनतेसमोर एक प्रश्न उभा राहिला आहे की, जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा आमदारांवर केला जाणारा खर्च कुठून येत आहे? तिन्ही राजकीय पक्षाच्या आमदारांची उठाठेव आणि अलिशान हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च जवळपास कोट्यावधीच्या घरात आहे. 

मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी त्यांना अज्ञात ठिकाणी तसेच अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. हे आमदार चार्टड प्लेनमधून मुंबई आणि बंगळुरु प्रवास करत आहेत. तसेच सुप्रीम कोर्टात सुरु असणाऱ्या सुनावणीसाठी वकीलांची फौज तयार आहे त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त आमदारांना आपल्या पक्षात ठेवण्यासाठी हा खर्च केला जात आहे. एका आमदारावर जवळपास 20 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. बंगळुरु आणि मुंबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये या आमदारांना ठेवलं गेलं तिथे त्यांच्या राहण्याची सोय ज्या हॉटेलमध्ये केली आहे तेथील दिवसाचा खर्च 4 हजार रुपयांपासून 11 हजार रुपयांपर्यंत आहे. तर बंगळुरु, मुंबईमधील विशेष विमानाचा खर्च 4 लाख रुपये प्रति प्रवास आहे. 

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, आमदारांनासोबत ठेवण्यासाठी प्रत्येक पक्षाने कमीत कमी आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यासोबत या आमदारांना महाराष्ट्रातील शिर्डी मंदिरात जाण्यासाठी विशेष विमान बुक केलं गेलं. तर दुसरीकडे या अफाट खर्चामागे काँग्रेस-जेडीएसने भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. मात्र वास्तविक परिस्थिती पाहता हा सगळा पैसा कोण खर्च करतोय हे कोणालाही माहिती नाही. जर भाजपा हा खर्च करत नसेल तर बंडखोर आमदारांना त्यांच्या सोयीप्रमाणे विशेष विमानं कशी मिळत आहेत? असा सवाल काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. 

कर्नाटकातील ही राजकीय परिस्थिती पहिल्यांदा नाही. याआधी 14 महिन्यांमध्ये 3 वेळा जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षांनी आपल्या आमदारांना आलिशान हॉटेलमध्ये ठेवलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही अशाचप्रकारे आमदारांना एकत्रितपणे मुंबई, गोव्याला पाठविण्यात आलं होतं.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस