शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्नाटकातील बंडखोर आमदारांसाठी कोट्यावधीचा खर्च करतंय तरी कोण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 12:20 IST

मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी त्यांना अज्ञात ठिकाणी तसेच अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देप्रत्येक पक्षाने आमदारांवर कमीत कमी आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले आहेतबंडखोर आमदारांना त्यांच्या सोयीप्रमाणे विशेष विमानं कशी मिळत आहेत? काँग्रेसचा सवाल कर्नाटकात याआधीही अनेकदा अशाप्रकारे राजकीय संकटं आली आहेत

बंगळुरु - कर्नाटकात सध्या होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष्य आहे. कर्नाटकात प्रत्येक दिवशी काही ना काही राजकीय नाट्य घडत आहे. या संपूर्ण घडामोडीत कर्नाटकातील जनतेसमोर एक प्रश्न उभा राहिला आहे की, जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा आमदारांवर केला जाणारा खर्च कुठून येत आहे? तिन्ही राजकीय पक्षाच्या आमदारांची उठाठेव आणि अलिशान हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च जवळपास कोट्यावधीच्या घरात आहे. 

मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी त्यांना अज्ञात ठिकाणी तसेच अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. हे आमदार चार्टड प्लेनमधून मुंबई आणि बंगळुरु प्रवास करत आहेत. तसेच सुप्रीम कोर्टात सुरु असणाऱ्या सुनावणीसाठी वकीलांची फौज तयार आहे त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त आमदारांना आपल्या पक्षात ठेवण्यासाठी हा खर्च केला जात आहे. एका आमदारावर जवळपास 20 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. बंगळुरु आणि मुंबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये या आमदारांना ठेवलं गेलं तिथे त्यांच्या राहण्याची सोय ज्या हॉटेलमध्ये केली आहे तेथील दिवसाचा खर्च 4 हजार रुपयांपासून 11 हजार रुपयांपर्यंत आहे. तर बंगळुरु, मुंबईमधील विशेष विमानाचा खर्च 4 लाख रुपये प्रति प्रवास आहे. 

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, आमदारांनासोबत ठेवण्यासाठी प्रत्येक पक्षाने कमीत कमी आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यासोबत या आमदारांना महाराष्ट्रातील शिर्डी मंदिरात जाण्यासाठी विशेष विमान बुक केलं गेलं. तर दुसरीकडे या अफाट खर्चामागे काँग्रेस-जेडीएसने भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. मात्र वास्तविक परिस्थिती पाहता हा सगळा पैसा कोण खर्च करतोय हे कोणालाही माहिती नाही. जर भाजपा हा खर्च करत नसेल तर बंडखोर आमदारांना त्यांच्या सोयीप्रमाणे विशेष विमानं कशी मिळत आहेत? असा सवाल काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. 

कर्नाटकातील ही राजकीय परिस्थिती पहिल्यांदा नाही. याआधी 14 महिन्यांमध्ये 3 वेळा जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षांनी आपल्या आमदारांना आलिशान हॉटेलमध्ये ठेवलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही अशाचप्रकारे आमदारांना एकत्रितपणे मुंबई, गोव्याला पाठविण्यात आलं होतं.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस