शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कर्नाटकातील बंडखोर आमदारांसाठी कोट्यावधीचा खर्च करतंय तरी कोण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 12:20 IST

मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी त्यांना अज्ञात ठिकाणी तसेच अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देप्रत्येक पक्षाने आमदारांवर कमीत कमी आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले आहेतबंडखोर आमदारांना त्यांच्या सोयीप्रमाणे विशेष विमानं कशी मिळत आहेत? काँग्रेसचा सवाल कर्नाटकात याआधीही अनेकदा अशाप्रकारे राजकीय संकटं आली आहेत

बंगळुरु - कर्नाटकात सध्या होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष्य आहे. कर्नाटकात प्रत्येक दिवशी काही ना काही राजकीय नाट्य घडत आहे. या संपूर्ण घडामोडीत कर्नाटकातील जनतेसमोर एक प्रश्न उभा राहिला आहे की, जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा आमदारांवर केला जाणारा खर्च कुठून येत आहे? तिन्ही राजकीय पक्षाच्या आमदारांची उठाठेव आणि अलिशान हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च जवळपास कोट्यावधीच्या घरात आहे. 

मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी त्यांना अज्ञात ठिकाणी तसेच अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. हे आमदार चार्टड प्लेनमधून मुंबई आणि बंगळुरु प्रवास करत आहेत. तसेच सुप्रीम कोर्टात सुरु असणाऱ्या सुनावणीसाठी वकीलांची फौज तयार आहे त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त आमदारांना आपल्या पक्षात ठेवण्यासाठी हा खर्च केला जात आहे. एका आमदारावर जवळपास 20 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. बंगळुरु आणि मुंबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये या आमदारांना ठेवलं गेलं तिथे त्यांच्या राहण्याची सोय ज्या हॉटेलमध्ये केली आहे तेथील दिवसाचा खर्च 4 हजार रुपयांपासून 11 हजार रुपयांपर्यंत आहे. तर बंगळुरु, मुंबईमधील विशेष विमानाचा खर्च 4 लाख रुपये प्रति प्रवास आहे. 

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, आमदारांनासोबत ठेवण्यासाठी प्रत्येक पक्षाने कमीत कमी आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यासोबत या आमदारांना महाराष्ट्रातील शिर्डी मंदिरात जाण्यासाठी विशेष विमान बुक केलं गेलं. तर दुसरीकडे या अफाट खर्चामागे काँग्रेस-जेडीएसने भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. मात्र वास्तविक परिस्थिती पाहता हा सगळा पैसा कोण खर्च करतोय हे कोणालाही माहिती नाही. जर भाजपा हा खर्च करत नसेल तर बंडखोर आमदारांना त्यांच्या सोयीप्रमाणे विशेष विमानं कशी मिळत आहेत? असा सवाल काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. 

कर्नाटकातील ही राजकीय परिस्थिती पहिल्यांदा नाही. याआधी 14 महिन्यांमध्ये 3 वेळा जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षांनी आपल्या आमदारांना आलिशान हॉटेलमध्ये ठेवलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही अशाचप्रकारे आमदारांना एकत्रितपणे मुंबई, गोव्याला पाठविण्यात आलं होतं.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस