शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

कोण आहेत के सुरेंद्रन? भाजपनं वायनाडमधून उतरवलं मैदानात, राहुल गांधींचं टेन्शन वाढवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 09:48 IST

K Surendran vs Rahul Gandhi: भाजपने के सुरेंद्रन यांना मैदानात उरवल्याने राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. ते यावेळीही वायनाडमधूनच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. याशिवाय, अमेठीतूनही निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र भाजपने वायनाडसाठी घोषित केलेल्या उमेदवाराची चर्चा अधिक आहे. तर जाणून घेऊयात, कोण आहेत केरळ भाजपाध्यक्ष? का सुरू आहे त्यांची एवढी चर्चा...?

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांना आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वायनाडमधून प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे. सुरेंद्रन मैदानात उरल्याने राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. ते यावेळीही वायनाडमधूनच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. याशिवाय, अमेठीतूनही निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र भाजपने वायनाडसाठी घोषित केलेल्या उमेदवाराची चर्चा अधिक आहे. तर जाणून घेऊयात, कोण आहेत केरळ भाजपाध्यक्ष? का सुरू आहे त्यांची एवढी चर्चा...? केरळ भाजपाध्यक्ष के. सुरेंद्रन -- के. सुरेंद्रन हे नॉर्थ केरळमधील एक मोठे नेते आहेत. ते 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.  - गेल्यावेळी त्यांनी पथानामथिट्टा (Pathanamthitta) या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.- 2018 मध्ये सबरीमाला आंदोलनावेळी सुरेंद्रन यांना अटकही करण्यात आली होती. त्यावेळी ते एका महिन्याहूनही अधिक काळ जेलमध्ये होते.- के. सुरेंद्रन यांनी  2021 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर निवडणूक लढली होती. मात्र या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला.- यावेळी सुरेंद्रन संपूर्ण तयारीत आहेत. उमेदवारी घोषित झाल्यानंतर, त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत आणि राहुल गांधींचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे. त्यांनी एक्सवर लिहिले, 'मला हे सांगताना आनंद होत आहे की, भाजपने वायनाडमध्ये इंडी अलायन्सचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एनडीएचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा केली.'

वायनाडमध्ये अशी होणार फाइट -विरोधी पक्षांनी I.N.D.I.A. नावाने आघाडी तयार केली असली तरी, काँग्रेस आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेला सीपीआय या दोघांनीही वायनाडमधून आपापले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. सीपीआयने ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे राहुल गांधींच्या मतांमध्ये विभाजनाचा धोका आहे. महत्वाचे म्हणजे, वायनाड हा रायबरेली आणि अमेठीप्रमाणेच काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जातो. येथे गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे.

राहुल गांधी यांनी 2019 च्या निवडणुकीत वायनाडमध्ये सीपीआयच्या उमेदवाराचा 4.31 लाख मतांनी पराभाव केला होता. यावेळी, भाजपच्या उमेदवाराला केवळ 78,000 मतेच मिळाली होती आणि तो तिसऱ्या स्थानावर होता. मात्र यावेळी सुरेंद्रन हे राहुल गांधी यांना कडवे आव्हान देऊ शकतात, अशी आशा भाजपला आहे. 

टॅग्स :Keralaकेरळlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी