शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

दही, ताक, लस्सीवर GST लावण्याचा निर्णय नेमका कुणाचा? अखेर वित्त मंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 20:06 IST

GST: पीठ, तांदूळ, डाळ यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याचा निर्णय हा विविध राज्यांच्या वित्तमंत्र्यांच्या समुहाने एकमताने घेतला होता, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली -  जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जुलैपासून अनेक वस्तू आणि पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. या करवाढीचा सातत्याने विरोध होत आहे. आता केंद्र सरकारकडून याबाबत नवं विधान समोर आलं आहे. पीठ, तांदूळ, डाळ यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याचा निर्णय हा विविध राज्यांच्या वित्तमंत्र्यांच्या समुहाने एकमताने घेतला होता, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

याबाबत वित्तराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेमध्ये प्रश्नोत्तरादरम्यान, पुरवणी प्रश्नांचं उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितले की, जीएसटी परिषदेच्या लखनौमध्ये झालेल्या ४५ व्या बैठकीत विविध राज्यांच्या मंत्र्यांचा समुह बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या जीओएममध्ये कर्नाटक, बिहार, केरळ, गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांच्या मंत्र्यांचा समावेश होता. त्यांनी हेसुद्धा सांगितले की. हे जीओएम सर्वसंमत्तीने निर्णय घेते.

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी याबाबत एक प्रश्न विचारला होता. हल्लीच ज्या बैठकीमध्ये धान्य, दही, लस्सी यावर जीएसटी लावण्याचा निर्णय झाला. त्या बैठकीमध्ये विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या दिल्ली, केरळ, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे मंत्री उपस्थित होते का? तसेच या राज्यांच्या मंत्र्यांनी बैठकीमध्ये या वस्तूंवर GST लावण्याच्या निर्णयाला विरोध केला होता का? या प्रश्नाला उत्तर देताना पंकज चौधरी यांनी सांगितले की, याबाबत निर्णय घेणाऱ्या समूहात असलेल्या व्यक्तींकडून मान्यता मिळाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. एवढंच नाही तर त्यांनी पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीच्या चौकटीत आणण्याशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, अशा प्रकारचे निर्णय हे GST परिषद घेते. तसेच त्यामध्ये हा प्रस्ताव आला होता.

दरम्यान, भाजपा सदस्य अशोक वाजपेयी यांनी एक देश एक किंमत या सिद्धांतानुसार पेट्रोलियम उत्पादनांवर समाज जीएसटी लागू करण्यात येणार का असा प्रश्न विचारला असता, पंकज चौधरी यांनी सांगितलं की, प्रस्तावावर अजून विचार केला जात आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीCentral Governmentकेंद्र सरकारRajya Sabhaराज्यसभा