शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे कोणती? 200 रेल्वेगाड्यांची होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 16:18 IST

प्रिमियर ट्रेनच्या 72 जोड्यांबरोबर इतर 128 गाड्यांचीही तपासणी होणार आहे. यामध्ये इंटरसिटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, संपर्क क्रांती आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे अधिकाधिक स्वच्छ होण्यासाठी आता 200 रेल्वेगाड्यांची तपासणी केली जाणार आहे. शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो गाड्यांचा यामध्ये समावेश असेल. या सर्वेक्षणात शौचालये, स्वच्छतेची पातळी, कापडाची गुणवत्ता, स्वच्छतेसाठी वापरले जाणारी रसायने यांचीही पाहणी केली जाणार आहे. यापुर्वी रेल्वे स्थानकांचा पाहणी करुन झाली आहे. आता रेल्वेगाड्यांची तपासणी करुन स्वच्छतेबाबत काळजी घेतली जाणार आहे.प्रिमियर ट्रेनच्या 72 जोड्यांबरोबर इतर 128 गाड्यांचीही तपासणी होणार आहे. यामध्ये इंटरसिटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, संपर्क क्रांती आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. प्रत्येक मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांमधील 60 प्रवाशांकडून स्वच्छतेबाबतचे मत घेतले जाईल तर प्रिमियर गाडीतील 100 लोकांकडून माहिती घेतली जाईल.प्रवाशांकडून माहिती घेतल्यावरही ट्रेनमधील स्वच्छतेची व्यवस्था काटेकोरपणे तपासली जाईल. तसेच ऑन बोर्ड हाऊसकिपिंग सर्विस म्हणजे रेल्वेमध्ये स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या लोकांच्या कामाची गुणवत्ताही तपासली जाईल.रेल्वेचा वाढणार वेग, अॅल्युमिनियम कोचचे होणार रायबरेलीत उत्पादन भारतामध्ये प्रथमच रायबरेलीतील मॉडर्न कोच फॅक्टरी येथे वजनाने अत्यंत हलके आणि टिकाऊ असे रेल्वे कोच बनवले जाणार आहेत. हे कोच अॅल्युमिनियमपासून तयार केले जाणार आहेत. पुढील आर्थिक वर्षामध्ये हे डबे भारतामध्ये वापरले जाण्याची शक्यता आहे.पोलादी डब्यांच्या तुलनेत हे कोच वजनाने हलके असून कमी ऊर्जेच्या मदतीने खेचले जाऊ शकताच यामुळे रेल्वेची गतीही वाढवली जाऊ शकते. रेल्वेच्या आधुनिकीकरण मोहिमेत या नव्या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. दिल्ली मेट्रोसाठीही अॅल्युमिनियम कोचेसचा वापर केला गेला आहे. मॉडर्न कोच फॅक्टरीने या अॅल्युमिनियम कोचचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दिला असून त्यांच्या मंजुरीनंतर उत्पादन सुरु होईल. यासाठी जपान किंवा युरोपातून तंत्रज्ञान आणले जाईल. त्यासाठी भारतीय तज्ज्ञांचे शिष्टमंडळ या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये युरोपमध्ये भेट देऊन आले आहे. गेल्या 15 वर्षांपासून युरोपमधील काही देश आणि जपान या डब्यांचा वापर करत आहेत.मॉडर्न कोच फॅक्टरीने वर्षाला 250 कोच बनवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर रेल्वे बोर्डाने वर्षाला 500 कोच बनवण्यासाठी प्रकल्प अहवाल बनवण्याचे सुचवले आहे. सध्या भारताकडे त्याचे तंत्रज्ञान नसल्यामुळे सुरुवातील या कोचची किंमत अधिक असेल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयल