शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 08:47 IST

सरकारने गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी तीन विधेयके तयार केली आहेत.

केंद्रातील मोदी सरकार बुधवारी लोकसभे तीन महत्वाची विधेयके सादर करणार आहे. यात, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अथवा कुठल्याही राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील मंत्री, यांना गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याच्या आरोपाखाली सलग 30 दिवसांसाठी अटक अथवा ताब्यात ठेवल्यास पदावरून हटवण्यची तरतूद आहे.

खरे तर, सध्या कुठल्याही कायद्यात, अटक अथवा न्यायालयीन कोठडीसारख्या परिस्थितीत एखाद्या नेत्याला त्यांच्या पदावरून हटवता येईल, अशी कुठलीही तरतूद नाही. याच उणीवा दूर करण्यासाठी, सरकारने गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी तीन विधेयके तयार केली आहेत.

ही तीन विधेयके कोणती ? - केंद्र सरकार बुधवार जी विधेयके सादर करणार आहे, त्यांत केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक २०२५, संविधान (एकशे तीसवी दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक २०२५ यांचा समावेश आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत यासंदर्भातील प्रस्ताव मांडतील.

वरील पैकी संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत विशेष बहुमताची आवश्यकता असेल. तर इतर दोन विधेयके साध्या बहुमतानेही मंजूर करता येऊ शकतात.

या विधेयकांसंदर्भात सरकारचे म्हणणे काय ? -या विधेयकांसंदर्भात सरकारचे म्हणणे आहे की, संवैधानिक नैतिकता आणि सुशासन राखण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. तसेच, जर एखादा लोकप्रतिनिधी गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली तुरुंगात असेल, तर तो जनतेच्या विश्वासाला तडा पोहोचवू शकतो, असेही विधेयकांच्या प्रस्तावात म्हणण्यात आले आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदAmit Shahअमित शाहNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा