शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 17:05 IST

राहुल गांधी यांनी आज बिहारमधून 'मतदार हक्क यात्रा' सुरू केली आहे.

Rahul Gandhi on EC:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आजपासून(दि.१७) बिहारमध्ये 'मतदार हक्क यात्रा' सुरू केली आहे. मतदार यादीतील अनियमिततेबाबत सासाराम येथून सुरू झालेली यात्रा सुमारे १६ दिवस चालणार आहे. या यात्रेत राज्यातील २५ जिल्हे व्यापले जातील. या यात्रेत तेजस्वी यादव आणि डाव्या पक्षांचे नेतेही राहुल यांच्यासोबत सामील झाले आहेत. दरम्यान, यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

महाराष्ट्रात १ कोटी मतदार निर्माण केलेसासाराम येथील जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "भाजप-आरएसएस संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे जिथे निवडणुका होतात, तिथे तिथे त्यांचा विजय होतो. आम्ही थोडी चौकशी केली, तेव्हा आम्हाला आढळले की, महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने १ कोटी मतदार निर्माण केले. जिथे जिथे नवीन मतदार आले, तिथे तिथे भाजप युती जिंकली. भाजपला सर्व नवीन मतदारांकडून मते मिळाली." 

बिहारमध्ये मत चोरीची तयारी"निवडणूक आयोगाने माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले, मात्र ते भाजपला विचारत नाहीत. जेव्हा आम्ही सीसीटीव्ही मागितले, तेव्हा त्यांनी नकार दिला. लोकसभा-विधानसभेच्या मतांची चोरी होत आहे. बिहारमध्येही ते मतदारांना विभागून मतांची चोरी करण्याची तयारी करत आहेत. मात्र, आम्ही त्यांना हे करू देणार नाही. बिहारचे लोकही त्यांना हे करू देणार नाहीत. निवडणूक आयोग काय करत आहे, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. निवडणूक आयोग कसे चोरी करते, हे आम्ही सर्वांना दाखवून दिले आहे," अशी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केली.

आम्ही ५०% आरक्षणाची भिंत तोडू राहुल गांधींनी यावेळी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणतात, "आम्ही संसदेत म्हटले होते की, आम्हाला देशात जातीय जनगणना करावी लागेल, तसेच ५०% आरक्षणाची भिंतही तोडावी लागेल. भाजप आणि नरेंद्र मोदी दबावाखाली आले आणि जातीय जनगणना जाहीर केली. पण, पंतप्रधान मोदी जातीय जनगणना योग्यरित्या करणार नाहीत. कारण त्यांचे सत्य समोर येईल. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी जातीय जनगणना करेल आणि ५०% आरक्षणाची भिंत तोडेल," असा दावा त्यांनी केला.

'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र