शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 17:05 IST

राहुल गांधी यांनी आज बिहारमधून 'मतदार हक्क यात्रा' सुरू केली आहे.

Rahul Gandhi on EC:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आजपासून(दि.१७) बिहारमध्ये 'मतदार हक्क यात्रा' सुरू केली आहे. मतदार यादीतील अनियमिततेबाबत सासाराम येथून सुरू झालेली यात्रा सुमारे १६ दिवस चालणार आहे. या यात्रेत राज्यातील २५ जिल्हे व्यापले जातील. या यात्रेत तेजस्वी यादव आणि डाव्या पक्षांचे नेतेही राहुल यांच्यासोबत सामील झाले आहेत. दरम्यान, यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

महाराष्ट्रात १ कोटी मतदार निर्माण केलेसासाराम येथील जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "भाजप-आरएसएस संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे जिथे निवडणुका होतात, तिथे तिथे त्यांचा विजय होतो. आम्ही थोडी चौकशी केली, तेव्हा आम्हाला आढळले की, महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने १ कोटी मतदार निर्माण केले. जिथे जिथे नवीन मतदार आले, तिथे तिथे भाजप युती जिंकली. भाजपला सर्व नवीन मतदारांकडून मते मिळाली." 

बिहारमध्ये मत चोरीची तयारी"निवडणूक आयोगाने माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले, मात्र ते भाजपला विचारत नाहीत. जेव्हा आम्ही सीसीटीव्ही मागितले, तेव्हा त्यांनी नकार दिला. लोकसभा-विधानसभेच्या मतांची चोरी होत आहे. बिहारमध्येही ते मतदारांना विभागून मतांची चोरी करण्याची तयारी करत आहेत. मात्र, आम्ही त्यांना हे करू देणार नाही. बिहारचे लोकही त्यांना हे करू देणार नाहीत. निवडणूक आयोग काय करत आहे, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. निवडणूक आयोग कसे चोरी करते, हे आम्ही सर्वांना दाखवून दिले आहे," अशी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केली.

आम्ही ५०% आरक्षणाची भिंत तोडू राहुल गांधींनी यावेळी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणतात, "आम्ही संसदेत म्हटले होते की, आम्हाला देशात जातीय जनगणना करावी लागेल, तसेच ५०% आरक्षणाची भिंतही तोडावी लागेल. भाजप आणि नरेंद्र मोदी दबावाखाली आले आणि जातीय जनगणना जाहीर केली. पण, पंतप्रधान मोदी जातीय जनगणना योग्यरित्या करणार नाहीत. कारण त्यांचे सत्य समोर येईल. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी जातीय जनगणना करेल आणि ५०% आरक्षणाची भिंत तोडेल," असा दावा त्यांनी केला.

'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र